…अन्यथा आरटीओच्या चेकपोस्ट अदानींच्या ताब्यात जाणार; मालमत्ता वाचवण्यासाठी परिवहन विभागाची सरकारकडे 504 कोटींची मागणी

…अन्यथा आरटीओच्या चेकपोस्ट अदानींच्या ताब्यात जाणार; मालमत्ता वाचवण्यासाठी परिवहन विभागाची सरकारकडे 504 कोटींची मागणी

विमानतळे, धारावी यासह मोक्याच्या जागा उद्योगपती अदानींच्या घशात घालण्याचे राज्य शासनाचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. आता राज्यातील आरटीओच्या चेकपोस्टही अदानींच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. सरकारने या चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्या चेकपोस्टचे संचालन करारान्वये 2033 पर्यंत अदानींच्या कंपनीकडे असल्याने सरकारला 504 कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. अन्यथा या चेकपोस्ट अदानींच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारने आरटीओच्या सर्व चेकपोस्ट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रफिकचे नियंत्रण करतानाच रस्ते कर वसूल करण्यासाठी 1966 पासून या चेकपोस्ट सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर व सर्व कामे डिजिटल होत असल्यामुळे या चौक्यांची आता आवश्यकता राहिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चेकपोस्ट लवकरच बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने प्रशासकीय त्रुटी दूर करून परिवहन विभागाने एक अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे.

राज्यात आरटीओ आणि सीमाशुल्क विभाग यांच्या एकत्रित तपासणी नाक्यांसाठी ‘इंटिग्रेटेड चेक पोस्ट’ प्रकल्प राबवण्यात आला होता. या 22 चेकपोस्टच्या संचालनासाठी अदानी समूहाचा भाग असलेल्या मेसर्स अदानी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी सरकारने करार केला होता. त्यामुळे चेकपोस्ट बंद केल्यास या कंपनीला सरकारकडून नुकसानभरपाई म्हणून 504 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ही रक्कम दिल्याशिवाय परिवहन विभागाला चेकपोस्टची मालकी पुन्हा मिळणार नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विराट कोहलीची निवृत्ती, पण अनुष्का शर्माचे ते स्वप्न अधुरंच; पोस्ट करत म्हणाली माझी इच्छा… विराट कोहलीची निवृत्ती, पण अनुष्का शर्माचे ते स्वप्न अधुरंच; पोस्ट करत म्हणाली माझी इच्छा…
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आज (१२ मे) कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत...
शाहरुख खानचं प्रॉडक्शन हाऊस या मुलीच्या कुटुंबीयांना देणार 62 लाख; पण नक्की कारण काय?
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानची मोठी अॅक्शन; चाहत्यांनाही वाटेल कौतुक
हाय कोलेस्ट्रोलची समस्या झटक्यात दूर होईल, पतंजलीचे हे औषध खायला सुरुवात करा; रिसर्चमध्ये दावा
Virat Kohli Retires : एका युगाचा अंत झाला, कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीच्या योगदानासाठी BCCI ने मानले आभार
Operation Sindoor पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार
नागरिकांनो सावधान! पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा हिंदुस्थानी अधिकारी भासवून करतेय फोन, वाचा सविस्तर माहिती