1971 ची गोष्ट वेगळी होती, आपल्याला आता शांतता हवी आहे; काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे मत

1971 ची गोष्ट वेगळी होती, आपल्याला आता शांतता हवी आहे; काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे मत

आपल्याला दहशतवाद्यांना धडा शिकवायचा होता आणि आपण तो शिकवला आहे असे मत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. तसेच 1971 ची गोष्ट वेगळी होती, आपल्याला आता शांतता हवी आहे असेही थरूर म्हणाले.

एएनआयशी बोलताना शशी थरूर म्हणाले की, दोन्ही देशांत तणाव वाढला होता. हिंदुस्थानला शांतता हवी आहे. पूंछमधील लोकांना विचारा की किती लोक मारले गेले. युद्ध थांबवलं पाहिजे अशी माझी भूमिका नाहीये. पण जेव्हा गरज असेल तेव्हाच लढलं पाहिजे. पण हे युद्ध आपल्याला सुरू ठेवायचं नाहिये. आम्हाला फक्त दहशतवाद्यांना धडा शिकवायचा आहे आणि तो आम्ही शिकवला आहे.

तसेच पहलगाम हल्ल्यात ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला त्यांच्या मारेकऱ्यांना शोधलं पाहिजे. ही बाब अतिशय गरजेची आहे. या गोष्टीला वेळ लागेल, पण निर्दोष नागरिकांना मारणाऱ्यांना सोडता कामा नये. याचा अर्थ असा नाही की आपण संपूर्ण देशाला एका मोठ्या युद्धात ढकलून द्यायचं.

थरूर म्हणाले की यावेळी पाकिस्तानसोबत आणखी युद्ध वाढवण्याची गरज नव्हती. आपल्या सैनिकांचे आयुष्य धोक्यात टाकायचं नव्हतं. हिंदुस्थानने आपल्या लोकांची समृद्धी, विकास आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यावेळी शांतीचा मार्गच आपल्यासाठी योग्य आहे.

तसेच 1971 साली झालेला विजय आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा नकाशा बदलला होता. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आजचा पाकिस्तान वेगळा आहे. त्यांच्या हत्यारं आहेत, सैन्य आहे. 1971 चे युद्ध हे बांगलादेशला स्वांतत्र्य देण्याचे एक नैतिक लक्ष्य ठेवून लढलं होतं असेही थरूर म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;