Virat Kohli Retires : एका युगाचा अंत झाला, कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीच्या योगदानासाठी BCCI ने मानले आभार

Virat Kohli Retires : एका युगाचा अंत झाला, कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीच्या योगदानासाठी BCCI ने मानले आभार

हिंदुस्थानचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कोहलीने सोमवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत याबाबत माहिती शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, “कसोटी क्रिकेटने माझी परीक्षा घेतली, मला आकार दिला आहे, असे धडे शिकवले आहेत, जे मी आयुष्यभर लक्षात ठेवेन.”

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने केलेल्या कामगिरीचे कौतुक करत बीसीसीआयने विराट कोहलीचे आभार मानले आहेत. बीसीसीआयने X वर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, “कसोटी क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला, पण वारसा कायम राहील. टीम इंडियासाठी त्याने दिलेले योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल.”

दरम्यान, कोहलीने 10 मे रोजी बीसीसीआयला सांगितले होते की, तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छितो. बोर्डाने कोहलीला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत विराटची कामगिरी चांगली नव्हती. या मालिकेत त्याने 23.75 च्या सरासरीने धावा केल्या. 8 पैकी 7 वेळा तो ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूवर बाद झाला. कोहलीने बीजीटीमध्ये 9 डावात 190 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश होता. विराट कोहलीने 123 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने 30 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली. विराटने 7 द्विशतके ठोकली. 2017 आणि 2018 मध्ये त्याला वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं निवृत्तीनंतर विराट आणि अनुष्काचा आहे हा प्लॅन? स्वत:च सांगितलं
सर्वांच्या मनावर राज्य करणारा क्रिकेटर, सर्वांचा लाडका खेळाडू विराट कोहलीने कसोटी क्रिकेट खेळण्यातून आता निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निर्णयाने नक्कीच...
बिग बींनी सोडला होता भारत, 6800 किमी दूर असलेल्या या देशात झाले स्थायिक
पाकड्यांच्या कुरापती सुरुच, पंतप्रधानांच्या भाषणानंतर सांबा सेक्टरमध्ये पुन्हा ड्रोन दिसले
IPL 2025 – आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार सामने
पापाने व्यापार बंद करनेकी धमकी देकर वॉर रुकवा दी, संजय राऊत यांचा निशाणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार आणि युद्धबंदीवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, काँग्रेसची मागणी
जालन्यात वीज पडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू