नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन

नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन

शहरातील नद्यांवर नदी सुधार प्रकल्प राबवला जात आहे. रविवारी पुन्हा नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी काढलेल्या पदयात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पिंपळे निलख येथील शहीद अशोक कामठे उद्यान ते पिंपळे निलख स्मशानभूमीजवळील नदीपात्रापर्यंत नागरिक व पर्यावरणप्रेमींनी पदयात्रा काढली. नदीकाठी गेल्यानंतर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नदी सुधार योजनेअंतर्गत झालेल्या वृक्षतोडीमुळे गतप्राण झालेली झाडे, अधिवास नष्ट झाल्यामुळे प्राण गमावलेल्या पशु पक्ष्यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नदी सुधार प्रकल्प राबवताना नदीकाठची सुमारे 40 हजार झाडे तोडली अथवा पुनर्रोपणाच्या नावाखाली मारली जाणार आहेत. त्यामुळे प्रकल्प राबवताना नदीचे नैसर्गिक पात्र, जैवविविधता आणि नदी प्रदूषणमुक्ती या बाबींवर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले.

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. पर्यावरणप्रेमींशी चर्चा करून नदीपात्राची बनसोडे यांनी पाहणी केली. नदी सुधार योजनेच्या नावाखाली होत असलेली बेकायदेशीर वृक्षतोड चुकीची आहे. नदीकाठी भराव टाकल्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाचे काम तत्काळ थांबविण्याच्या सूचना बनसोडे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना दिल्या. या कामाची चौकशी करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर नदी सुधार प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अण्णा बनसोडे यांनी दिले. शहरात सातत्याने बेकायदेशीरपणे वृक्षतोड होत असून अनेक प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल झाल्याचे बनसोडे यांना सांगण्यात आले. त्याबाबत बोलताना बनसोडे म्हणाले, ‘अवैधपणे वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, ‘तो’ दाखला देत म्हणाले… भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी अमेरिकेची मध्यस्थी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर, ‘तो’ दाखला देत म्हणाले…
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले,...
गोविंदाचे घर आतून एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही, बार सेक्शन ते बेडरूम फारच सुंदर इंटेरिअर, प्रत्येक कोपरा वास्तुनुसार बांधलेला
heart attack: महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढतोय? जाणून घ्या तज्ञांचे मत…
मोदी समर्थकांनी विक्रम मिसरी यांना केलं ट्रोल, कुटुंबातील महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी; कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी
पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचाच आणि तो आम्हाला परत मिळालाच पाहिजे; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
पाकिस्तान स्वतः लढत नाही, तो दहशतवाद्यांना पुढे करतो – मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसमुक्त हिंदुस्थान करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला – हर्षवर्धन सपकाळ