पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या इन्स्टाग्रामवर भारतात बंदी, वाणी कपूरने उचलले मोठे पाऊल; चाहते देखील हैराण

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या इन्स्टाग्रामवर भारतात बंदी, वाणी कपूरने उचलले मोठे पाऊल; चाहते देखील हैराण

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं तर, काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि त्याच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत होती. याच दरम्यान, भारत सरकारने एक मोठं पाऊल उचलत सर्व पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक केले. याच पार्श्वभूमीवर आता ‘अबीर गुलाल’मध्ये फवाद खानसोबत दिसणाऱ्या वाणी कपूरनेही एक मोठं पाऊल उचललं आहे.

खरं तर, भारतात फवाद खानचं इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक होताच वाणीच्या इंस्टाग्रामवरून चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट अचानक गायब झाल्या. यानंतर लोकांना वाटू लागलं की वाणीने स्वतःला या चित्रपटापासून दूर केलं आहे, पण सत्य काही वेगळं आहे. या पोस्ट वाणी कपूरने स्वतः हटवलेल्या नाहीत. खरं तर, चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट फवाद खानने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केल्या होत्या आणि जेव्हा त्याचं इंस्टा अकाउंट भारतात बंद झालं, तेव्हा त्याने केलेल्या सर्व पोस्टही गायब झाल्या.

वाचा: ‘… तर मी इंग्लंडला निघून जाईन’ भारत-पाक युद्धावर पाकिस्तानी नेत्याची मजेशीर प्रतिक्रिया

‘अबीर गुलाल’च्या सर्व पोस्ट डिलीट

‘अबीर गुलाल’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये वाणी कपूरसोबत पाकिस्तानी अभिनेता फवाद खान दिसणार होता. हा चित्रपट 9 मे 2025 रोजी प्रदर्शित होणार होता. वाणीने या चित्रपटाशी संबंधित अनेक पोस्ट फवाद खानसोबत इंस्टाग्रामवर कोलॅबोरेशन म्हणून शेअर केल्या होत्या. पण आता भारतात फवादचं अकाउंट बंद करण्यात आलं आहे, त्यामुळे त्याच्या कोलॅब पोस्टही वाणीच्या अकाउंटवरून हटवल्या गेल्या आहेत. भारत सरकारच्या नव्या निर्देशांनुसार आता फवाद खानचं इंस्टाग्राम अकाउंट भारतात दिसत नाही.

पहलगाम हल्ल्यानंतर इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी

त्यामुळे ज्या पोस्टमध्ये फवाद टॅग केलेला होता, त्या पोस्टही वाणीच्या प्रोफाइलवरून हटवल्या गेल्या आहेत. मात्र, या पोस्ट परदेशात अजूनही दिसत आहेत. याचा अर्थ असा की वाणीने स्वतःहून काहीही हटवलं नाही, तर हे सर्व तांत्रिक कारणांमुळे घडलं आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने या चित्रपटावर देशात बंदी घातली आहे. हा हल्ला 22 एप्रिल रोजी झाला होता, ज्यामध्ये 26 पर्यटक मारले गेले होते. या घटनेनंतर सरकारने कठोर पावलं उचलत केवळ चित्रपटाच्या प्रदर्शनावरच बंदी घातली नाही, तर त्याच्याशी संबंधित डिजिटल कंटेंटही हटवला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम
हिंदी सिनेमात काही जोड्या प्रेक्षकांना खूपच आवडतात. कलाकारांची ही केमिस्ट्री अशी जुळून आलेली असते की अशा जोड्यांचे चित्रपट खूपच प्रसिद्ध...
काही लोक भीती निर्माण करतात; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला प्रकाश राज यांचा पाठिंबा
बेडरुममध्ये प्रायव्हसी, मोठी बाग अन् आलिशान बंगला, रिंकू राजगुरूचं घर कसंय माहितीय का?
मंत्रालयातील दलालांनी गद्दारांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी चढ्या दराने विकण्याचा डाव आखलाय – अंबादास दानवे
चंद्रपूरमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट, दुबार पिकांना फटका
Ratnagiri News – रत्नागिरीत बाल अंतराळवीरांची सायकल सैर, किड्स सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन
विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, सुरक्षा भिंतीवर आदळल्याने विमानाला अपघात