मला राग येतोय… ‘लबाडांनो, पाणी द्या!’ शहरातील महिलांचा शासन-प्रशासनावर संताप

मला राग येतोय… ‘लबाडांनो, पाणी द्या!’ शहरातील महिलांचा शासन-प्रशासनावर संताप

मला राग येतोय… ‘लबाडांनो, पाणी द्या!’ असे म्हणत छत्रपती संभाजीनगर शहरातील पहाडसिंगपुरा आणि भावसिंगपुरा येथील महिलांनी शासन आणि प्रशासनावर पाणी प्रश्नाच्या समस्येवरून आपला राग, संताप व आक्रोश व्यक्त केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या ‘लबाडांनो, पाणी द्या!’ या जनआंदोलनाअंतर्गत पहाडसिंगपुरा आणि भावसिंगपुरा या दोन ठिकाणी आज 3 मे रोजी ‘मला राग येतोय…’ आंदोलन करण्यात आले.
‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी समस्येवरून स्थिती निर्माण झाली आहे. पहाडसिंगपुरा आणि भावसिंगपुरा परिसरात खूपच कमी पाणी येते. दहा दिवसानंतर नळाला पाणी आले तरीही अर्धा तासच आणि तेही कमी दाबाने पाणी येते. नवीन पाईपलाईन टाकली असली तरीही प्रेशरने पाणी येत नाही. पाण्याची वेळ नाही. रात्री-अपरात्री केव्हाही पाणी येते. किमान दोन तास तरी पाणी द्या पाण्याची वेळ निश्चित करा, असा टाहो आंदोलनकर्त्या महिलांनी फोडला.

या भागात 12 ते 13 दिवसाला पाणी येत असल्याने खरंच खूप भयंकर राग येतोय. सर्वसामान्य नागरिकांकडे पाण्याचे टँकर विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. पाणी प्रश्नामुळे महिला हताश झाल्या असून, हा प्रश्न सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. पाण्यावाचून मरण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. किमान ४ दिवसाला तरी पाणी द्या, अशी केविलवाणी मागणी माता-भगिनी यांनी केली.

पहाडसिंगपुरा व भावसिंगपुरा परिसरातील साईनगर, संभाजीचौक, प्रभातनगर, गोल्डन सिटी येथे मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. माता-भगिनी यांच्या व्यथा ऐकून माझेपण मन व्याकुळ झाले असून डोकं सुन्न झालं आहे. मनपा प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

याप्रसंगी शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, उपशहरप्रमुख गणेश लोखंडे, सुरेश पवार, योगेश पवार, विलास संबारे, प्रमोद मोरे, योगेश पवार, बाळासाहेब खेत्रे, गणेश जोबळे, ताराचंद कुंडारे, वैभव लकडे, इंदर फत्तेलष्कर, संतोष चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, माजी नगरसेविका मनीषा लोखंडे, अनिता लगड उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा.. आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा..
एखाद्या श्रेत्रात आपल्या सोबतची व्यक्ती आपल्या पुढे जाऊ लागली की काहींना असुरक्षित वाटू लागतं. मग अशातून एकमेकांविषयी ईर्षा, द्वेष आणि...
मी हिंदू, मी दलित..; पहलगाम हल्ल्यानंतर धर्माबद्दल काय म्हणाला ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेता?
आईसह तुझीही कोयत्याने खांडोळी करून टाकीन म्हणत अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार, नराधम बाप जेरबंद
समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील कुटुंबाला लुटले! गाडीसमोर आडवी गाडी लावली 12 लाखांच्या दागिन्यांची लूट
लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली – संजय राऊत
12 दिवस होऊनही सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही, संजय राऊत यांचा घणाघात
पाकड्यांच्या कुरापती सुरूच; सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार