IPL 2025 – पंजाबच्या मार्गात लखनौचा अडथळा

IPL 2025 – पंजाबच्या मार्गात लखनौचा अडथळा

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुणतक्त्यात चौथ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्जला ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीत राहण्यासाठी आणखी एक-दोन विजयांची गरज आहे. मात्र, आज बलाढ्य लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्या मार्गात अडथळा असेल. लखनौला प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आता ‘हारना मना है’! त्यामुळे या संघातील खेळाडू आज पंजाबविरुद्ध मैदानावर जीवाचे रान करताना दिसतील.

कर्णधार रिषभ पंतचा आऊट ऑफ फॉर्म लखनौ संघाची मुख्य समस्या होय. मात्र, एडेन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पुरन, आयुष बदोनी, डेव्हिड मिलर असे एकाचढ एक फलंदाज या संघाच्या दिमतीला आहेत. याचबरोबर आवेश खान, शार्दुल ठाकुर, रवि बिष्णोई व दिग्वेश राठी अशा वैविध्यपूर्ण ताफ्यामुळे प्रतिस्पर्धी संघांसाठी लखनौविरुद्धची लढाई नक्कीच सोपी नसते.

दुसरीकडे लखनौला घरच्या मैदानावर पंजाबकडून पराभव पत्करावा लागला होता. आता परतीच्या लढतीत या पराभवाचा बदला घेण्याची संधी या संघाला असेल. पंजाबकडेही कर्णधार श्रेयस अय्यरसह प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, नेहाल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंह अशी प्रतिभावान फलंदाजांची फळी आहे.

IPL 2025 – म्हात्रे-जडेजाची झुंजार खेळी व्यर्थ, थरारक विजय मिळवत बंगळुरूनं 18 वर्षांत पहिल्यांदाच ‘असा’ कारनामा केला

युझवेंद्र चहलसारख्या फिरकीवीरामुळे हा संघ अतिशय धोकादायक आहे. शिवाय अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, मार्को जॉन्सन, मार्कस स्टोइनिस अशा गोलंदाजांमुळे लखनौचा संघ कमालीचा संतुलित वाटतो. मात्र, 10 पैकी पाच लढती गमावलेला हा संघ गुणतालिकेत सध्या सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी या संघाला आता प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा.. आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा..
एखाद्या श्रेत्रात आपल्या सोबतची व्यक्ती आपल्या पुढे जाऊ लागली की काहींना असुरक्षित वाटू लागतं. मग अशातून एकमेकांविषयी ईर्षा, द्वेष आणि...
मी हिंदू, मी दलित..; पहलगाम हल्ल्यानंतर धर्माबद्दल काय म्हणाला ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेता?
आईसह तुझीही कोयत्याने खांडोळी करून टाकीन म्हणत अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार, नराधम बाप जेरबंद
समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील कुटुंबाला लुटले! गाडीसमोर आडवी गाडी लावली 12 लाखांच्या दागिन्यांची लूट
लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली – संजय राऊत
12 दिवस होऊनही सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही, संजय राऊत यांचा घणाघात
पाकड्यांच्या कुरापती सुरूच; सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार