हिंदुस्थानच्या CRPF जवानचं पाक तरुणीशी लग्न, व्हिसा रद्द झाल्याने मायदेशी परतावं लागणार

हिंदुस्थानच्या CRPF जवानचं पाक तरुणीशी लग्न, व्हिसा रद्द झाल्याने मायदेशी परतावं लागणार

जम्मू-कश्मीरातील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरण खोऱ्यात भयंकर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याने  संपूर्ण देश हादरला. महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी सरकारने पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेतले. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानींना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे एका सीआरपीएफ जवानाच्या पाकिस्तानी पत्नीलाही हिंदुस्थान सोडावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुनीर खान असे या CRPF जवानाचे नाव असून मिलन खान असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. मुनीर खान हे जम्मू जिल्ह्यातील घरोट्याचे रहिवाशी आहेत. पहलगामच्या दहशवादी हल्ल्यामुळे हिंदुस्थानने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आणि हिंदुस्थानातील सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले.

दरम्यान, सरकारच्या निर्णयानंतर मिलन खान यांना जम्मूहून पाकिस्तानला परत पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सरकारने जारी केलेले हे आदेश मिलन खान यांना मान्य नव्हते. पाकिस्तानला जाण्याऐवजी हिंदुस्थानात राहण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. आम्हाला कुटुंबासोबत राहण्याची परवानगी दिली पाहिजे. पहलगाममधील हल्ल्यात निष्पाप लोकांच्या झालेल्या क्रूर हत्येचा आम्ही निषेध करतो. त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

कसे झाले लग्न-

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलन ही पाकिस्तानातील पंजाब प्रदेशाची रहिवासी आहे. ती पाकिस्तानातील पंजाबमधील गुजरांवाला भागातील रहिवासी आहे. मुनीर आणि मिलन यांनी ऑनलाईन विवाह केला होता. 24 मे 2024 रोजी या जोडप्याचे लग्न झाले. व्हिसा न मिळाल्याने त्यांनी एक अनोखी पद्धत अवलंबली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लग्न केले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“आमच्या वेदनेची थट्टा करताय..”; पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरला गेलेल्या अतुल कुलकर्णींना अशोक पंडित यांनी सुनावलं “आमच्या वेदनेची थट्टा करताय..”; पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरला गेलेल्या अतुल कुलकर्णींना अशोक पंडित यांनी सुनावलं
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काश्मीरच्या पर्यटनावर त्याचा मोठा परिणाम झाला. या हल्ल्याच्या पाच दिवसांनंतर...
मुंबई हल्ल्याशी जोडलं गेलं होतं आलिया भट्टच्या भावाचं नाव; 7 वेळा झालीये अटक
या मुस्लिम अभिनेत्याने पाकिस्तानात जाऊन त्यांची बदनामी केली; थेट प्रवेशावर बंदी
प्रेम, वेदना…अनोखी कहाणी; पद्माराज राजगोपाल नायर दिग्दर्शित “माझी प्रारतना” चित्रपटाचं हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित!
उन्हाळ्यात सब्जा बिया खाण्याचे 5 सोपे ट्रिक्स, तुमच्या आरोग्याला होईल दुप्पट फायदा
तुमचे तोंड वारंवार कोरडे पडतंय? होऊ शकतात हे 5 गंभीर आजारांची लक्षणे, जाणून घ्या
इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर