मसुरीत कश्मिरी शॉल विकणाऱ्या दोन तरुणांना मारहाण, 16 तरुणांचे कश्मीरमध्ये पलायन

मसुरीत कश्मिरी शॉल विकणाऱ्या दोन तरुणांना मारहाण, 16 तरुणांचे कश्मीरमध्ये पलायन

उत्तराखंडच्या मसुरीत शॉल विकणाऱ्या दोन कश्मिरी तरुणांना काही गुंडांनी मारहाण केली आहे. त्यामुळे घाबरून जम्मू कश्मीरच्या 16 जणांनी उत्तराखंड सोडून जम्मू कश्मीरमध्ये परतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मसुरी शहरात जम्मू कश्मीरचे दोन तरुण शॉल विकत होते. तेव्हा काही तरुण आले आणि त्यांनी थेट मारहाण करायला सुरूवात केली. तसेच इथे व्यवसाय करायचा नाही अशी धमकी दिली.

या गुंडांनी या कश्मिरी तरुणांकडे ओळखपत्र मागिलते आणि निघून जायला सांगितले. शब्बीर अहमद दार हा कुपवाडमध्ये राहणारा तरुण. त्याने सांगितले की गेल्या 18 वर्षांपासून आम्ही इथे येतोय आणि व्यवसाय करतोय. इथे आल्यावर आणि मशिदीजवळ राहतो आणि बरीच वर्ष इथल्या लोकांना आम्ही ओळखतोय. पण आमच्या मदतीसाठी कुणीही धावून आले नाही. इथे कश्मीरमधून अनेक लोक व्यवसायासाठी येतात पण कधीही स्थानिक नागरिकांशी चुकीचे वागले नाही असे शब्बीर म्हणाला. या घटनेनंतर शॉल विकणारे 16 लोक कश्मीरला निघून गेले. या प्रकरणी तीन जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात सब्जा बिया खाण्याचे 5 सोपे ट्रिक्स, तुमच्या आरोग्याला होईल दुप्पट फायदा उन्हाळ्यात सब्जा बिया खाण्याचे 5 सोपे ट्रिक्स, तुमच्या आरोग्याला होईल दुप्पट फायदा
    या कडक उन्हात आपण शक्य तितके असे पदार्थ खावेत ज्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळेल. या ऋतूत तुमच्या आहारात
तुमचे तोंड वारंवार कोरडे पडतंय? होऊ शकतात हे 5 गंभीर आजारांची लक्षणे, जाणून घ्या
इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर
पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांना धक्का बसला? पाळलं मौन, 8 दिवसांपासून करतायत फक्त ‘या’ गोष्टी
‘लग्नानंतर माझी रात्रीची झोप उडाली होती’, माधुरी दीक्षिने सांगितला डॉ. नेनेंसोबतचा लग्नानंतरचा अनुभव
पीक विमा योजनेतील नवा ‘फडणवीस विमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ
Caste Census देशात जातीनिहाय जनगणना होणार, विरोधकांच्या मागणीला यश