कोल्हापूर असुरक्षित; पाकिस्तानी, बांगलादेशींना शोधून हाकला, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास शिवसेना राबविणार शोधमोहीम

कोल्हापूर असुरक्षित; पाकिस्तानी, बांगलादेशींना शोधून हाकला, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास शिवसेना राबविणार शोधमोहीम

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानशी संबंध तोडले असले, तरी अजूनही पाकिस्तानी नागरिक हिंदुस्थानात वास्तव्यास आहेत. याबाबत मंत्र्यांच्या भूमिकाही संदिग्ध असल्याने हे धोकादायक आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही दहशतवाद्यांशी संबंधित काही घटना समोर आल्याने असुरक्षित बनलेल्या या जिल्ह्यात लपलेल्या पाकिस्तानी व बांगलादेशींना शोधून हकलून द्या, अशी मागणी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात जबाबदार प्रशासन दुर्लक्ष करणार असेल, तर शिवसेना स्वतः ही शोधमोहीम राबविणार असल्याचा इशाराही देण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

कश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस व जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर वास्तव्य करणारे पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम जलद गतीने करावी. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामधील इरफान अत्तारसारखा अतिरेकी कश्मीरमध्ये 2008 साली मारला गेला, हे विसरून चालणार नाही. अनेक ठिकाणी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यासह ध्वज फडकविल्याच्या संतापजनक घटनाही घडल्या आहेत.

करवीर तालुक्यातील नागदेववाडी येथे बांगलादेशी महिला बेकायदा राहत असल्याचे आढळले होते. तसेच यापूर्वी दहशतवादी हल्ल्यातील कर्नाटकमधील यासीन भटकळचा थेट संबंध देशाने अनुभवला आहे. पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतात. त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी ते औद्योगिक, बांधकाम व सोने चांदी कारागीर (गुजरी) यांसारख्या अनेक ठिकाणी काम करीत आहेत. या सर्वांचा शोध पेऊन त्यांची माहिती पोलीस प्रशासनाकडे असणे आवश्यक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

जमातीच्या निमित्ताने धार्मिक कारणासाठी जे मुस्लिम लोक वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातात व परराज्यांतून येतात, त्यांची नावे व सविस्तर माहिती पोलीस प्रशासनाकडे असणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी 40 लहान मुले एका टेम्पोमध्ये सापडली होती. त्याचे पुढे काय झाले, याचा तपास पुढे आला नाही. जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपआपल्या कारकिर्दीसाठी सोयीची भूमिका घेण्यासाठी अक्षम्य दुर्लक्ष करू नये. गोवा, कोकण समुद्रमार्ग, तसेच कर्नाटक ही ठिकाणे जवळ असल्याने कोल्हापूर जिल्हा हे भविष्यात पाकिस्तानी व बांगलादेशी कट्टर धर्मांधांचा अड्डा होऊ शकतो, या गंभीर बाबीकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती
देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर...
Pahalgam Terrorist Attack : अजून 15 मिनिट थांबलो असतो तर…पहलगाम हल्ल्याचा तो थरार, नांदेडच्या दाम्पत्याच्या अंगावर आजही काटा
7 वर्ष लहान रणबीर कपूर सोबत ‘प्रेमसंबंध’, अनेक वर्षांनंतर अमीषा म्हणाली, ‘आम्ही दोघांनी एकत्र…’
“तेव्हा संजय दत्तने कुराण भेट दिली होती”; अमीषा पटेलचा खुलासा
पाकिस्तानात आपण कोणाला खूश करतोय? पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तरांचा रोखठोक सवाल
Deven Bharti – देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर यांच्या जागी नियुक्ती
पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात