मुलाने गळफास घेतल्याचे कळताच आईने विष घेतले, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मुलाने गळफास घेतल्याचे कळताच आईने विष घेतले, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळताच आईनेही विष प्राशन करून जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला येथे घडली आहे.

वाहेगाव आमला येथे खेत्रे कुटुंब वास्तव्यास असून त्यांच्याकडे केवळ एक एकर जमीन आहे. या जमिनीवरही कर्ज असून ते फेडण्याच्या विवंचनेत अभिमान खेत्रे (वय – 35) होते. याच वैफल्यातून त्यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाने आत्महत्या केल्याचे कळताच आई कौशल्या भागुजी खेत्रे (वय – 70) यांनीही विष प्राशन केले.

कौशल्याबाईंचा मंगळवारी सकाळी 10 वाजता मृत्यू झाला. घरात एकाच वेळी दोन मृत्यू झाल्याने खेत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिमान खेत्रे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल