श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात मोठी दुर्घटना, 20 फूटाची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू

श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात मोठी दुर्घटना, 20 फूटाची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. येथील श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवादरम्यान मंदिराजवळील 20 फूट लांबीचा भाग कोसळला. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतर एसडीआरएफ आणि एनडीआरएफची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात भगवान वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी त्यांच्या वास्तविक स्वरूपात भक्तांसमोर येतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अशातच मंदिराचा 20 फूट लांबींची भिंत अचानक कोसळली आणि अनेक भाविक या ढिगाऱ्याखाली अडकले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि एसडीआरएफ, एनडीआरएफ संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली. यानंतर लगेचच त्यांनी बचावकार्य सुरू केले. या अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती
देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर...
Pahalgam Terrorist Attack : अजून 15 मिनिट थांबलो असतो तर…पहलगाम हल्ल्याचा तो थरार, नांदेडच्या दाम्पत्याच्या अंगावर आजही काटा
7 वर्ष लहान रणबीर कपूर सोबत ‘प्रेमसंबंध’, अनेक वर्षांनंतर अमीषा म्हणाली, ‘आम्ही दोघांनी एकत्र…’
“तेव्हा संजय दत्तने कुराण भेट दिली होती”; अमीषा पटेलचा खुलासा
पाकिस्तानात आपण कोणाला खूश करतोय? पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तरांचा रोखठोक सवाल
Deven Bharti – देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर यांच्या जागी नियुक्ती
पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात