Intel कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, सीईओ लिप बू टॅन यांनी लिहिले पत्र

Intel कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, सीईओ लिप बू टॅन यांनी लिहिले पत्र

कॉम्प्युटर चीप बनवणारी कंपनी इंटेल आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. कंपनीचे सीईओ लिप बू टॅन यांनी पत्र लिहून ही माहिती दिली आहे. कंपनीला अनेक कर्मचाऱ्यांची गरज नाही आणि कमी संख्येत आपण जास्त काम करू शकतो असा विश्वास टॅन यांनी व्यक्त केला आहे.

टॅन यांनी पत्र लिहून म्हटले आहे की आपण एक नवीन सुरुवात करत आहोत. मला पाहून आश्चर्य वाटलं की गेली अनेक वर्ष इंटेलमध्ये मोठ्या प्रमाणात मॅनेजर्स आहेत. मला असं वाटतं की कमी कर्मचारी असल्यावर आपण अधिक उत्तम काम करू शकतो. प्रत्येक टीममधून 8 ते 10 जणांना काढले जाईल. कंपनीला एवढ्या कर्मचाऱ्यांची गरज नाही. असे टॅन यांनी म्हटले आहे.

कंपनीतून एकूण किती जणांना काढले जाईल याबाबत अद्याप कुठली माहिती कळालेली नाही. पण एक लाख ८ हजार 900 कर्मचाऱ्यांपैकी 20 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असे सांगण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘शरद पवार आधी बोलले पहलगाम हल्ल्याशी धर्माचा संंबंध नाही, मग फडणवीसांनी…’, शहाजीबापू पाटील यांचं मोठं वक्तव्य ‘शरद पवार आधी बोलले पहलगाम हल्ल्याशी धर्माचा संंबंध नाही, मग फडणवीसांनी…’, शहाजीबापू पाटील यांचं मोठं वक्तव्य
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून...
महागाईचा आणखी एक झटका; दुधाच्या दरात पुन्हा वाढ
जेट्टी, बंदरे, बोटी आणि मच्छी व्यवसायातील घुसखोर शोधून काढा, मंत्री नितेश राणे यांचे आदेश
‘ऐ मोटी, आय लव यू यार..मुझसे शादी कर लो’, प्रसिद्ध मुस्लिम अभिनेत्रीच्या प्रेमात होता हिंदू सुपरस्टार पण…
उन्हाळ्यात हेअर स्पा करताना काही गोष्टी ठेवा लक्षात, चुकूनही करू नका ‘या’ चुका
Cancer Risk Control: स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ खा, कर्करोग आणि कोलेस्ट्रॉल समस्या चटकन होतील गायब
उन्हाळ्यात जास्त पपई खाणे हानिकारक आहे का? जाणून घ्या