मुंबईत सोने खरेदी करणाऱ्यांची निराशा, दराने गाठला नवा उच्चांक, प्रतितोळा भाव…

मुंबईत सोने खरेदी करणाऱ्यांची निराशा, दराने गाठला नवा उच्चांक, प्रतितोळा भाव…

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीचे भाव गगनाला भिडताना दिसत आहेत. त्यातच आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत शहरात सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या मुंबईत सोन्याचा दर प्रतितोळा तब्बल 94,500 रुपयांवर पोहोचला आहे. या दरवाढीमुळे सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे.

सध्या महागाई सातत्याने वाढत आहे. त्यातच लग्नसराई सुरु आहे. अशाच आता मुंबईतील सोने खरेदीदारांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम मुंबईतील सराफा बाजारावर दिसून येत आहे. जागतिक बाजारात अस्थिरता असल्याने गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.

लहान-मोठ्या सराफा व्यावसायिकांसाठी चिंतेची बाब

विशेष म्हणजे, सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे सोने खरेदी करत आहेत. मात्र, सोन्याच्या भावात झालेली ही उच्चांकी वाढ त्यांच्यासाठी मोठी अडचण ठरत आहे. अनेक जण वाढलेल्या भावामुळे सोने खरेदीचा विचार पुढे ढकलण्याची शक्यता आहे. सोन्याच्या भावात झालेली ही वाढ केवळ खरेदी करणाऱ्यांना नव्हे तर लहान-मोठ्या सराफा व्यावसायिकांसाठीही चिंतेची बाब ठरत आहे. सोन्याचा भाव वाढल्यामुळे सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारात काय बदल घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सोन्याच्या दराने गाठला विक्रमी उच्चांक

दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आगामी काळात लवकरच सोन्याचे दर 1 लाखांपर्यंत जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जळगावच्या सराफा व्यावसायिकांनी ही शक्यता वर्तवली आहे. सध्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. जळगावात सध्या सोन्याचा दर 97 हजार 700 रुपये इतका झाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात ‘या’ भाजीचा रस शरीर ठेवतो थंड पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या उन्हाळ्यात ‘या’ भाजीचा रस शरीर ठेवतो थंड पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कारण या ऋतूत अनेकदा लोकांना थंड पेये आणि कोल्ड्रिंक्स पिणे आवडते, परंतु या...
Curly Hair Tips: उन्हाळ्यात कुरळे केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ 4 ट्रिक्स करा फॉलो
जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय – हर्षवर्धन सपकाळ
CSK Vs PBKS – चहलची हॅट्रीक अन् श्रेयसची विस्फोटक फलंदाजी, पंजाबचा 4 विकेटने विजय; चेन्नई IPL मधून आऊट
अक्षयतृतीया निमित्त श्री विठ्ठलास आमरसाचा नैवेद्य, भाविकांनीही चाखली चव
Pahalgam Terror Attack हिंदुस्थानचा मोठा निर्णय, पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस केला बंद
‘शरद पवार आधी बोलले पहलगाम हल्ल्याशी धर्माचा संंबंध नाही, मग फडणवीसांनी…’, शहाजीबापू पाटील यांचं मोठं वक्तव्य