अक्षयतृतीया निमित्त श्री विठ्ठलास आमरसाचा नैवेद्य, भाविकांनीही चाखली चव

अक्षयतृतीया निमित्त श्री विठ्ठलास आमरसाचा नैवेद्य, भाविकांनीही चाखली चव

हिंदू वर्षातील महत्वाचे साडेतीन मुहुर्तापैकी अक्षय तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार अक्षय तृतीया पासून वटपौर्णिमे पर्यंत श्रीं विठ्ठल रुक्मिणीच्या महानैवेद्यामध्ये शेवयाची खीर ऐवजी आमरसाचा समावेश करण्यात आला आहे. तर श्री संत तुकाराम भवन येथील भाविकांसाठी च्या अन्नछेत्रात दुपारच्या भोजनप्रसादामध्ये देखील आमरसाचा समावेश करण्यात आला आहे. याचा अक्षय तृतीया निमित्त सुमारे 2000 ते 2500 भाविकांनी लाभ घेतला आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हिंदू धर्मात आंब्याचा प्रसाद महत्त्वाचा मानला गेला आहे. यामुळेच आजपासून विठुरायालाही महाप्रसादात आमरस देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. विठुरायाच्या परिपूर्ण महाप्रसादामध्ये लिंबू, चटणी, कोशिंबीर, पातळ भाजी, सुकी भाजी, वरण-भात, कढी, वरण-भात, पुर्‍या, भजी तर पकवान्नामध्ये पुरणपोळी, साखर भात, श्रीखंड,बेसनाचे लाडू, शेवयाची खीर आणि आमरस याचा समावेश आहे. महाप्रसादातील शेवयाच्या खिरीची जागा आजपासून आमरसाने घेतली आहे. आता वटपौर्णिमेपर्यंत श्रींच्या महाप्रसादात आमरस असणार आहे.

रुक्मिणी मातेलाही अशाच पद्धतीचा पंचपकवांन्नाचा महानैवेद्य दाखवण्यात येत आहे. रुक्मिणी मातेच्या महाप्रसादात कटाची आमटी हे वेगळे पदार्थ असतात. त्यामुळे आज आता देवाच्या बरोबर देवाच्या भक्तांनाही अन्नछत्रामध्ये आमरस पोळीचा बेत मंदिर समितीच्या वतीने देण्यात येत आहे. महाप्रसादालयात भाविकांकडूनही आमरसाचा गोडवा आवडीने चाखला जात असून भक्तांनी देखील आंब्याचा रस मिळत असल्याने समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, आनंद (गुजरात) येथील विठ्ठल भक्ताने श्री रुक्मिणी मातेस पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अर्पण केले असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगीतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

400 अतिरिक्त शिक्षकांना मुंबईत सामावून घ्या अन्यथा धरणे आंदोलन, शिक्षक सेनेची मागणी 400 अतिरिक्त शिक्षकांना मुंबईत सामावून घ्या अन्यथा धरणे आंदोलन, शिक्षक सेनेची मागणी
मुंबईतील अनुदानित शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या सुमारे 400 शिक्षकांना मुंबई किंवा नवी मुंबई, ठाणे महापालिकांच्या कार्यक्षेत्रात येणाऱया शाळांमध्ये सामावून घ्या. अन्यथा...
दादर येथे आज एमपीएससी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ सोहळा, शिवसेना आणि जाणीव ट्रस्टच्या वतीने आयोजन
बलात्कारातील आरोपीच्या खात्यात शंभर कोटींचे व्यवहार!
Ratnagiri News – पाय मारला अन् डांबर निघालं; गुडघे गावाच्या हद्दीत सुरू असलेलं रस्त्याचे काम निकृष्ट, ग्रामस्थ आक्रमक
उन्हाळ्यात ‘या’ भाजीचा रस शरीर ठेवतो थंड पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या
Curly Hair Tips: उन्हाळ्यात कुरळे केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ 4 ट्रिक्स करा फॉलो
जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय – हर्षवर्धन सपकाळ