तुम मराठी लोग गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो… घाटकोपरमध्ये गुजरात्यांकडून मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक

तुम मराठी लोग गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो… घाटकोपरमध्ये गुजरात्यांकडून मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक

स्वप्नांचं शहर असलेल्या मुंबईत विविध जातीचे, धर्माचे लोकं येतात आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने इथे मेहनत करून राहतात. कोणी काय खावं-प्यावं हा खरंतर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत खाण्या-पिण्याच्या मुद्यावरून वाद होताना दिसत असून महाराष्ट्राचा, मुंबईचा सख्खा पुत्र असलेल्या मराठी माणसांनाच अपमानास्पद वागणूक मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये परप्रांतीय कुटुंबांनी बाहेरुन गुंड आणून मराठी कुटुंबाला मारहाण केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मराठी माणसांना मुंबईत चुकीची वागणूक दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून घाटकोपरमध्ये याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.

घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मांसाहार करतात म्हणून गुजराती कुटुंबाकडून मराठी कुटुंबातील लोकांचा अपमान केला असा मनसेचा आरोप आहे. मनसे पदाधिकाऱ्याने यासंदर्भातील पोस्ट केली असून त्यामुळे मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी हा वाद शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. यामुळे नवा गदारोळ माजण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील एका सोसायटीत हा प्रकार घडला. तेथे मराठी वि. अमराठी हा वाद चांगलाच पेटला आहे. तेथील एका गुजराती, मारवाडी आणि जैनबहुल सोसायटीमध्ये राहणाऱ्या आणि मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचे उघड झाले आहे. शाह नावाच्या व्यक्तीने या संबंधित मराठी कुटुंबाला बरंच सुनावलं. ‘तुम मराठी लोग गंदा है. तुम मच्छी मटण खाते हो’ असे त्याने मराठ कुटुंबाला सुनावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मात्र हा प्रकार समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी तेथे धाव घेतली आणि सोसायटीतील सदस्यांना चांगलीच समज दिली. मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी सोसायटीत शिरून तेथील संबंधित गुजराती आणि जैन रहिवाशांना या घटनेचा जाब विचारत त्यांना खडसावलं. मात्र मराठी कुटुंबाला त्रास देणारी शाह नावाची व्यक्ती समोर आलीच नाही. तर सोसायटीतील इतर रहिवाशांनी मात्र सारवासारव केली. आम्ही मराठी विरुद्ध अमराठी भेदभाव करत नाही, आम्ही मांसाहार खाण्यावर कोणतेही बंधन आणत नाही, असे ते म्हणताना दिसले.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे. मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. इथे अनेक भाषा बोलल्या जातात,” असे वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच आता त्याच घाटचकोपरमध्ये मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने हा वाद आणखीनच पेटण्याची चिन्हे आहेत.

काय आहे राजेश पार्टे यांची पोस्ट ?

या घटनेसंदर्भात मनसेचे राजेश पार्टे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत व्हिडीओ देखील शेअर केला. घाटकोपरच्या सोसायटीमध्ये ते संबंधित नागरिकांना समज देताना दिसले. राजेश पार्टे यांची पोस्ट जशीच्या तशी…

ह्या घाटकोपर मधे आम्ही मराठी माणसासाठी रोज रोज किती भांडायचं, तुम मराठी लोग गंदा है. तुम मच्छी मटण खाते हो. पुर्ण सोसायटी गुजराती फक्त ४ जण मराठी. रोजचा ह्यांचा ञास मराठी माणसाला खालच्या दर्जाची भाषा वापरून रोजचा आपमान. आज घुसलो कायते ऐकदा होऊनच जाऊदे. सगळ्यांची .. फाटली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Parte (@raj.parte.mns)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर इंस्टाग्रामने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मिशा अग्रवालचा जीव घेतला? आत्महत्या की हत्या? मृत्यूचे धक्कादायक कारण समोर
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालने 24 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. तिच्या कुटुंबीयांकडूनच याबाबतची माहिती सांगण्यात आली. पण तिच्या मृत्यूचे...
पहलगाम हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांना धक्का बसला? पाळलं मौन, 8 दिवसांपासून करतायत फक्त ‘या’ गोष्टी
‘लग्नानंतर माझी रात्रीची झोप उडाली होती’, माधुरी दीक्षिने सांगितला डॉ. नेनेंसोबतचा लग्नानंतरचा अनुभव
पीक विमा योजनेतील नवा ‘फडणवीस विमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ
Caste Census देशात जातीनिहाय जनगणना होणार, विरोधकांच्या मागणीला यश
Intel कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, सीईओ लिप बू टॅन यांनी लिहिले पत्र
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदचा लाहोरमधील सिक्रेट ठिकाणा उघड!