वेळ न दवडता ठोस पावले उचलावीत, पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधी यांची केंद्राला सूचना

वेळ न दवडता ठोस पावले उचलावीत, पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधी यांची केंद्राला सूचना

वेळ न दवडता ठोस पावले उचलावीत, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशी सूचना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केली आहे. मंगळवारी केंद्र सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयानंतर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले, “हा हल्ला थंड डोक्याने केलेला नरसंहार आहे. हा हिंदुस्थानच्या आत्म्यावर हल्ला आहे. यासाठी जबाबदार असलेल्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. सरकारने वेळ वाया घालवू नये.” ते म्हणाले, “त्यांना (दहशतवाद्यांना) हे समजून घ्यावे लागेल की, हे हिंदुस्थानसोबत करता येणार नाही. जे घडले ते कोणत्याही परिस्थितीत स्वीकारता येणार नाही.”

राहुल गांधी म्हणाले की, या कठीण काळात संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत उभा आहे. ते म्हणाले, ”विरोधी पक्ष सरकारला 100 टक्के पाठिंबा देत आहे. आता पंतप्रधान मोदींनी निर्णायक पाऊल उचलले पाहिजे. वेळ न दवडता ठोस पावले उचलावीत.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;