‘अमित अंकल’नी सांगितलं माझे वडीलच CM पदाचा चेहरा असणार! नितीश कुमार यांच्या मुलाचा दावा

‘अमित अंकल’नी सांगितलं माझे वडीलच CM पदाचा चेहरा असणार! नितीश कुमार यांच्या मुलाचा दावा

बिहारमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राजकीय हालचालींना वेग आला असून महाआघाडीनमधील नेत्यांच्या दिल्लीमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत, तर दुसरीकडे एनडीएनेही रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे.

आगामी निवडणुकीत एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.  जनता दलचे (यूनायटेड) अध्यक्ष व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याचे दावेही केले जात आहेत. अशातच नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी मोठा दावा केला आहे. ‘अमित अंकल’ यांनी सांगितले की माझे वडीलच आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहेत, असे विधान निशांत कुमार यांनी माध्यमांशी बोलताना केले.

‘माझे वडील 100 टक्के तंदुरुस्त आहेत. बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करेल. अमित शहा अंकल यांनी सांगितले की माझे वडीलच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील’, असे निशांत कुमार म्हणाले. तसेच नितीश कुमार निःसंशयपणे मुख्यमंत्री होतील आणि 2010 ला जदयूला जसे बहुमत दिले, तसे यावेळीही द्या, असे आवाहनही त्याने बिहारच्या नागरिकांना केले.

दरम्यान, याआधी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील असे विधान केले होते. एनडीएपुढे कोणतेही आव्हान नसल्याचेही ते म्हणाले होते. पाटणा येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यानंतर आता नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार यानेही अशाच प्रकारचे विधान केले आहे.

तत्पूर्वी दिल्लीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची जागावाटपासंदर्भात एक बैठक पार पडली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर खरगे यांनी बिहारमध्ये यावेळी बदल होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. बिहारमधील शेतकरी, कामगार, महिला, मागासवर्गीय आणि समाजातील इतर सर्वच घटकातील लोकांना महाआघाडीचीचे सरकार हवे आहे, असेही काँग्रेस अध्यक्ष यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात ‘या’ भाजीचा रस शरीर ठेवतो थंड पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या उन्हाळ्यात ‘या’ भाजीचा रस शरीर ठेवतो थंड पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कारण या ऋतूत अनेकदा लोकांना थंड पेये आणि कोल्ड्रिंक्स पिणे आवडते, परंतु या...
Curly Hair Tips: उन्हाळ्यात कुरळे केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ 4 ट्रिक्स करा फॉलो
जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय – हर्षवर्धन सपकाळ
CSK Vs PBKS – चहलची हॅट्रीक अन् श्रेयसची विस्फोटक फलंदाजी, पंजाबचा 4 विकेटने विजय; चेन्नई IPL मधून आऊट
अक्षयतृतीया निमित्त श्री विठ्ठलास आमरसाचा नैवेद्य, भाविकांनीही चाखली चव
Pahalgam Terror Attack हिंदुस्थानचा मोठा निर्णय, पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस केला बंद
‘शरद पवार आधी बोलले पहलगाम हल्ल्याशी धर्माचा संंबंध नाही, मग फडणवीसांनी…’, शहाजीबापू पाटील यांचं मोठं वक्तव्य