मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे महागात पडले, कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान प्रकरणी चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे महागात पडले, कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान प्रकरणी चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड

निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे मुंबई कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एका चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना 7 ऑक्टोबर रोजी घडली होती. ब्रेच कँडी येथील रहिवासी असलेला फ्रासोगर बत्तीवाला हाजी अलीहून वरळीला जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरियरला धडकून रेलिंग तोडून समुद्रात पडली. चालकाला वाचवण्यात यश आले.

स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी चुंबकीय उचल उपकरणांचा वापर करून वाहन बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर, महापालिकेने बत्तीवाला याच्या ताडदेव येथील निवासस्थानी पत्र पाठवून रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक रेलिंगचे नुकसान झाल्याची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. जर त्याने दंड भरला नाही तर तो मालमत्ता करातून वसूल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हाय प्रोटिन सोया-चणाडाळ करी रेसिपी, शाकाहारींसाठी सर्वोत्तम, जाणून घ्या हाय प्रोटिन सोया-चणाडाळ करी रेसिपी, शाकाहारींसाठी सर्वोत्तम, जाणून घ्या
सोया, सोया दुधापासून बनविलेले टोफू, अनेक प्रकारच्या डाळी, संपूर्ण धान्य इत्यादी प्रोटिनचे चांगले स्रोत आहेत आणि त्यात अस्वास्थ्यकर फॅट यात...
Ahilyanagar News – जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा
माथेरानची राणी पुन्हा धावणार; 6 नोव्हेंबरपासून प्रवासी सेवेत
चक्रीवादळानंतर बचावकार्यासाठी निघालेले लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, 6 जणांचा मृत्यू
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे महागात पडले, कोस्टल रोडच्या रेलिंगचे नुकसान प्रकरणी चालकाला 2.65 लाख रुपयांचा दंड
निवडणूक आयोगाने जनतेच्या भावनांची दखल घेतली नाही, अंबादास दानवे यांची टीका
ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही, मग आरामदायी प्रवासासाठी पट्ठ्याने अशी शक्कल लढवली की थेट तुरुंगात रवानगी