पाकिस्तानसोबत सामना खेळणे ही देशाशी गद्दारी, अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य

पाकिस्तानसोबत सामना खेळणे ही देशाशी गद्दारी, अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील दुबईतील रविवारी होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून मोदी सरकारवर विरोधी पक्षांकडून टीका होत आहे. यातच आम आदमी पक्षाचे आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाकिस्तानसोबत सामना खेळणे ही देशाशी गद्दारी असल्याचे म्हटले आहे. आप नेत्यांनी क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र कसे चालू शकतात, असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उत्तर मागितले आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्याला विरोध करत आप नेत्यांनी शनिवारी पक्षाच्या मुख्यालयात पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पुतळ्यांना जाळून निषेध व्यक्त केला. केजरीवाल यांनी आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या एका सोशल मीडिया पोस्टला रिट्वीट करत म्हटले की, “पाकिस्तानसोबत सामना खेळणे देशाशी गद्दारी आहे. प्रत्येक हिंदुस्थानी याबाबतीत अत्यंत संतापलेला आहे.”

यातच आप खासदार संजय सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर या दहशतवादविरोधी मोहिमेच्या विधानाचा उल्लेख करताना म्हटले, “मोदीजी म्हणाले होते ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, ते चालू आहे, मग ऑपरेशन क्रिकेट कसे काय चालू आहे?”

तर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, “पहलगाम हल्ल्यानंतर मोदीजींनी अभिमानाने म्हटले होते की ‘टॉक आणि टेरर एकत्र चालू शकत नाही’. राष्ट्रवाद फक्त तुमच्या भाषणांपुरता मर्यादित आहे का?”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका