स्पाइसजेटला ग्राहक आयोगाचा दणका; फ्लाइट 14 तास रखडले आणि फक्त एक बर्गर दिला! प्रवाशाला 55 हजारांची भरपाई देण्याचे आदेश

स्पाइसजेटला ग्राहक आयोगाचा दणका; फ्लाइट 14 तास रखडले आणि फक्त एक बर्गर दिला! प्रवाशाला 55 हजारांची भरपाई देण्याचे आदेश

तब्बल 14 तासांच्या उड्डाण विलंबासाठी प्रवाशाला केवळ एक बर्गर आणि फ्राईज दिल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने स्पाइसजेटला दणका दिला आहे. इतक्या तासांच्या विलंबासाठी ही व्यवस्था अपुरी असल्याचे सांगत आयोगाने प्रवाशाला 55 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारदार प्रवाशाने 27 जुलै रोजी दुबईहून मुंबईला येणारी फ्लाइट बुक केली होती. मात्र तिला खूप उशीर झाला. त्या कालावधीत त्याला पुरेशा सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे संतापून त्याने ग्राहक आयोगात तक्रार केली होती. त्याची तक्रार ग्राह्य धरत प्रदीप कडू आणि सदस्य गौरी कापसे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने विमान कंपनीला भरपाईचा आदेश दिला. मागील आठवड्यात दिलेल्या या निर्णयाची माहिती आज देण्यात आली. हा विलंब तांत्रिक बिघाडामुळे झाला आहे आणि या रखडपट्टीच्या कालावधीत प्रवाशांची काळजी घेणे कंपन्यांचे कर्तव्य आहे. प्रवासात असे अडथळे येऊ शकतात असे म्हणून कंपन्या कर्तव्यापासून पळ काढू शकत नाही, असे आयोगाने सुनावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता  गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडय़ाच्या अनुषंगाने कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तयार केलेल्या 288.17 कोटींच्या विकास आराखडय़ास...
सांगलीतील 10 हजारांवर शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात; कागदपत्रे जमविण्यासाठी धावपळ
425 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची दिल्ली, पुण्यात छापेमारी
विनापरवाना घोडागाडी शर्यत; चौघांवर गुन्हा
पालघरमध्ये 49 धोकादायक इमारतींवर यमाचा दबा, विरारची पुनरावृत्ती झाल्यास याला जबाबदार कोण? नोटीस दिल्यानंतरही इमारती रिकाम्या नाहीत
आता हद्दच झाली, पोलिसाने जपानी पर्यटकाकडून घेतली एक हजाराची लाच
पाकिस्तानातील पूर हा अल्लाहचा आशीर्वाद! बादल्या भरून ठेवा!! संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे अजब विधान