Asia cup 2025 India squad – आशिया चषकासाठी ‘टीम इंडिया’ची घोषणा; सूर्या कर्णधार, तर गिल उपकर्णधार

Asia cup 2025 India squad – आशिया चषकासाठी ‘टीम इंडिया’ची घोषणा; सूर्या कर्णधार, तर गिल उपकर्णधार

आशिया चषक टी-20 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत 9 सप्टेंबर पासून आशिया उपखंडात होणाऱ्या या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली.

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ आशिया चषक स्पर्धेत उतरणार आहे. उपकर्णधारपदाची धुरा शुभमन गिल याच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह हे फलंदाज संघात आहे.

जितेश शर्मा आणि संजू सॅमसन हे दोघे यष्टिरक्षक संघात निवडण्यात आले असून वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहसह अर्शदीप सिंग, हर्षित राणा यांच्याकडे असणार आहे. हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू तर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव फिरकीचे आक्रमण सांभाळतील.

राहुल, अय्यर, ऋतुराज यांना धक्का

केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांना संघात स्थान मिळालेले नाही. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतरही यापैकी एकाचीही निवड न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या साई सुदर्शन याच्याकडे ही निवड समितीने दुर्लक्ष केले आहे. इंग्लंड दौऱ्यात धावांसाठी तो झगडत होता, याचा फटका त्याला नक्कीच बसला आहे.

आशिया चषकासाठी संघ –

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंह.

रिझर्व्ह खेळाडू – यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिध कृष्णा आणि रियान पराग

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं
अनेकांना झोपण्याआधी अंघोळ करण्याची किंवा सकाळी काही नाश्ता करून मग थोड्यावेळाने अंघोळ करण्याची सवय असते. पण काहीजण कधी कधी काही...
Video नांदेडमधील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाची वाट खडतर, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे भाविकांचे हाल
GSTच्या नावाखाली मध्यमवर्गीयांची कमाई चुरून खाल्ल्यावर आता केंद्राला बदल करण्याचे सुचले, अंबादास दानवे यांची टीका
नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल