भाजपने महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या, मात्र आम्ही त्यांना बिहारमध्ये निवडणुका चोरू देणार नाही – राहुल गांधी

भाजपने महाराष्ट्रात निवडणुका चोरल्या, मात्र आम्ही त्यांना बिहारमध्ये निवडणुका चोरू देणार नाही – राहुल गांधी

भाजपने महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये लोकसभेत निवडणुका चोरल्या. मात्र आम्ही बिहार निवडणुका चोरू देणार नाही, असं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेली मतदार हक्क यात्रा आज बिहारमधील आरा येथे पोहोचली. या यात्रेत आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादवही सहभागी झाले होते. याचवेळी जनतेशी संवाद साधताना राहुल गांधी असं म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, “आरएसएस-भाजपला गरिबांचा आवाज ऐकू येऊ नये, असं वाटतं. पण गरिबांचा आवाज देशभर घुमेल. त्यांनी महाराष्ट्र, हरियाणात लोकसभा निवडणुकीत मते चोरली, पण आम्ही त्यांना बिहारमध्ये मते चोरू देणार नाही.”

यावेळी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, “बिहारच्या लोकांना कळेल की भाजपचा रथ येथे आधीही थांबवण्यात आला आहे. यावेळीही येथील लोक त्यांचा रथ थांबवतील.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;