पुन्हा एकत्र येताना वसंतदादांनी पक्षहिताचाच विचार केला

पुन्हा एकत्र येताना वसंतदादांनी पक्षहिताचाच विचार केला

‘तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार घालवल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. त्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा आम्ही सगळे एकत्र आलो. त्यावेळी पक्ष पुन्हा एकदा सावरायचा असेल तर पक्षाचे नेतृत्व शरदकडे द्यावे लागेल, असा निर्णय वसंतदादांनी घेतला. ज्या व्यक्तीचे सरकार मी पाड़ले, त्या व्यक्तीने मी काय केले ही गोष्ट मोठय़ा अंतःकरणाने विसरून गांधी-नेहरूंचे विचार मजबूत करण्यासाठी एकत्रिकरणाची भूमिका मांडली,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

‘सॅटर्डे क्लब’तर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, गेल्या 14 दिवसांत त्या ठिकाणी काहीच काम झालेले नाही. आम्ही रोज त्या ठिकाणी जातो. सही करतो. त्यानंतर आत गेल्यावर दंगा सुरू होतो आणि काम बंद पडते. अशा प्रकारची परिस्थिती पूर्वी नव्हती. राज्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने संसदीय कामकाज सुरू आहे, ते लोकशाहीला आणि संसदीय लोकशाहीला न पटण्यासारखे आहे. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही सर्वजण दिल्लीमध्ये एकत्र बसलो. यात मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह इतर पक्षांतील वरिष्ठ नेते होते. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचे ठरवून संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच तीनशे खासदारांनी आंदोलन केले. मात्र, आम्हा तीनशे लोकांना पोलिसांनी अटक करून पोलीस स्टेशनला नेले. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही आवाज उठवला आणि त्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी ही कृती केल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 01 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 01 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस...
बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?