Mumbai News – मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह, पोलीस तपास सुरू

Mumbai News – मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह, पोलीस तपास सुरू

कफ परेड येथून रविवारपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा मरीन ड्राईव्हच्या समुद्रात मृतदेह आढळून आला आहे. मनिता गुप्ता असे मयत तरुणीचे नाव आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिता दोन दिवसांपासून बेपत्ता होती. कफ परेड पोलीस ठाण्यात रविवारी मनिता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. कालपासून पोलीस तिचा शोध घेत होते. सोमवारी तिचा मृतदेह मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनिताच्या चेहऱ्यावर जखमा आढळल्या आहेत. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासाअंती ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत उलगडा होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडातील तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे नुकत्याच उघड झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात तिन संशयितांच्या न्यायालयाने पोलीस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे....
रोज सकाळी प्या शेवग्याच्या पानांचे पाणी, एक दोन नव्हे तर तुमच्या शरीराला मिळतील ‘हे’ 7 आश्चर्यकारक फायदे
माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन
Mumbai News – गोराई समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात टळला! पर्यटकांनी भरलेली मिनी बस भरतीच्या पाण्यात अडकली
देशात पाळीव प्राण्यांची तस्करीत 5 वर्षांत 4 पट वाढली, मुंबईत सर्वाधिक प्रकरणे
मेहुल चोक्सीला तुरुंगात युरोपीय मानवाधिकार मानकांनुसार मिळणार सुविधा, हिंदुस्थानने बेल्जियमला दिली माहिती
नेपाळमधील निदर्शनाला हिंसक वळण, 20 जणांचा मृत्यू; गृहमंत्री रमेश लेखक यांनी दिला राजीनामा