मारवाडी गो बॅक! तेलंगणामध्ये स्थानिक जनता उतरली रस्त्यावर

मारवाडी गो बॅक! तेलंगणामध्ये स्थानिक  जनता उतरली रस्त्यावर

तेलंगणामध्ये मारवाडी, गुजराती व जैन समाजाच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्रांचे आंदोलन पेटले आहे. मारवाडी व जैन समाजावर आर्थिक व व्यावसायिक दादागिरीचा आरोप करत स्थानिकांनी ‘मारवाडी गो बॅक’ अशी मोहीमच सुरू केली आहे.

सिकंदराबाद शहरात कार पार्किंगवरून काही जणांमध्ये वाद झाला. त्यावेळी मारवाडी व जैन समाजाच्या काही तरुणांनी जातीवरून हिणवत स्थानिक मुलांना मारहाण केली. तिथेच या वादाची ठिणगी पडली. ‘सिकंदराबादमध्ये घडलेली घटना एकमेव नाही. अशा अनेक घटना घडत आहेत. तेलुगू लोक पिऊन झोपतात, काम करत नाहीत अशी बदनामी हे लोक करत आहेत. मात्र आता आमचे लोक जागे झाले आहेत. मारवाडी, जैनांविरोधात सुरू झालेले आंदोलन उत्स्फूर्त आहे, असे पृथ्वीराज यांनी सांगितले. निवडणुकीच्या वेळी हे व्यापारी लोक राजकारण्यांना पैसा पुरवतात. छोट्या व्यावसायिकांना ते जमत नाही. त्यामुळे राजकारणीही मारवाडी, जैनांच्या दादागिरीकडे लक्ष देत नाहीत, असा आरोप पृथ्वीराज यांनी केला. आंदोलनामुळे हिंदूंमध्ये फूट पडत असल्याचा भाजपचा दावाही त्यांनी खोडून काढला. मारवाडी तरुणांनी ज्याला मारले तोही हिंदू होता. त्याला जातीवरून हिणवून मारले हे भाजपच्या लोकांना चालते का, असा सवालही त्यांनी केला.

व्यावसायिक व आर्थिक दादागिरी

‘व्यापारासाठी तेलंगणात आलेल्या मारवाडी व गुजराती समाजाची दादागिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशभरात या लोकांची मोठी लॉबी आहे. दिल्लीपासून राजस्थान, गुजरात सगळीकडे यांची व्यावसायिक साखळी आहे. उत्पादन, वितरण, विक्री सगळे काही आपल्याच हातात ठेवतात. इतरांना बिझनेस करूच देत नाहीत. कोणी बिझनेस करत असेल तर त्याला संपवायची कारस्थाने करतात. कॉण्ट्रक्ट किलिंग करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. वारंगलमध्ये दोन वर्षांपूर्वी अशीच हत्या झाली होती. बहुतेक सगळे काळे धंदे मारवाडी, जैन यांचेच आहेत’ असा आरोप या आंदोलनाचे नेते संगम रेड्डी पृथ्वीराज यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4...
शिर्डीत चार एकर जागेत मोफत पार्किंग, मंदिरालगतची गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून सुविधा
‘कुणबी’साठी सांगली जिह्यात 14 लाख दस्तावेजांची तपासणी
कोल्हापुरात 21 तास विसर्जन सोहळा, 2700 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद
अहिल्यानगरमध्ये 14 गणपतींची 12 तास मिरवणूक
इचलकरंजीत 26 तास मिरवणूक
साताऱ्यात 15 तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष