बिहारमध्ये मतं चोरण्यासाठी SIR प्रक्रिया राबवण्यात आली, राहुल गांधी यांचा आरोप

बिहारमध्ये मतं चोरण्यासाठी SIR प्रक्रिया राबवण्यात आली, राहुल गांधी यांचा आरोप

निवडणूक आयोग आणि भाजपची युती आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. तसेच बिहारमध्ये मतं चोरण्यासाठी SIR प्रक्रिया राबवण्यात आली असेही राहुल गांधी म्हणाले.

बिहारमध्ये मतदार यात्रेनंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोग बिल्कुल तटस्थ नाही. निवडणूक आयोग आणि भाजपची युती आहे. जर निवडणूक आयोग तटस्थ असता तर आयोगाने भाजप नेते अनुराग ठाकूर यांना नोटीस पाठवली असती. तसेच बिहारमध्ये मतं चोरण्यासाठी SIR प्रक्रिया राबवण्यात आली.

तसेच यात्रा अत्यंत यशस्वी झाली आहे आणि लोक मनापासून आमच्याशी जोडले जात आहे. आम्ही मतांची चोरी याबद्दल जे म्हटले होते, ते बिहारमधील लोक स्वीकारत आहेत हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाचे काम योग्य मतदार यादी उपलब्ध करून देणे आहे. पण महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये ते करण्यात तो अपयशी ठरले आहे. आमचा संपूर्ण दबाव निवडणूक आयोगाच्या वर्तणुकीत बदल घडवून आणण्यावर आहे आणि आम्ही थांबणार नाही. बिहारमध्ये मतांची चोरी होऊ देणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4...
शिर्डीत चार एकर जागेत मोफत पार्किंग, मंदिरालगतची गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून सुविधा
‘कुणबी’साठी सांगली जिह्यात 14 लाख दस्तावेजांची तपासणी
कोल्हापुरात 21 तास विसर्जन सोहळा, 2700 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद
अहिल्यानगरमध्ये 14 गणपतींची 12 तास मिरवणूक
इचलकरंजीत 26 तास मिरवणूक
साताऱ्यात 15 तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष