पुन्हा पुन्हा मतदान करून लोक कंटाळतात, म्हणून वन नेशन वन इलेक्शन गरजेचे; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे विधान

पुन्हा पुन्हा मतदान करून लोक कंटाळतात, म्हणून वन नेशन वन इलेक्शन गरजेचे; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे विधान

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वन नेशन वन इलेक्शन देशासाठी किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. गोयल म्हणाले की, लोक वारंवार मतदान करून कंटाळतात. जर ही व्यवस्था लागू झाली तर मतदारांचा सहभाग वाढेल, शासन अधिक प्रभावी होईल आणि खर्चातही बचत होईल असेही गोयल म्हणाले.

दिल्लीतील एका कार्यक्रमत गोयल म्हणाले की वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या वेळी निवडणुका झाल्यामुळे जनता आणि शासन दोघांवर ताण येतो. लोक मतदान करून थकतात, वारंवार मतदान केल्याने ते कंटाळतात असे गोयल म्हणाले.

तसेच जेव्हा आदर्श आचारसंहिता लागू होते तेव्हा प्रशासनिक कामकाज ठप्प होते. त्यांनी आंध्र प्रदेश आणि ओडिशाचे उदाहरण देत सांगितले की जिथे निवडणुका एकत्र घेतल्या जातात, तिथे मतदानाचा टक्का जास्त राहतो असेही गोयल म्हणाले.

गोयल यांनी जिल्हा स्तरापासून राज्य स्तरापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून Action Committees बनवण्याचे आवाहन केले. आपण प्रयत्न केला पाहिजे की जिल्हा ते राज्य स्तरापर्यंत संघटना मिळून एक अखिल भारतीय कृती समिती तयार करावी असेही गोयल यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या बाप्पा पावले; पावणेपाच हजार गुरुजींच्या कार्यमुक्तीचे आदेश, अहिल्यानगरमधील 4 हजार 720 शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या
यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिह्यात प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. यात आतापर्यंत 1 ते 3 या संवर्गातील 4...
शिर्डीत चार एकर जागेत मोफत पार्किंग, मंदिरालगतची गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून सुविधा
‘कुणबी’साठी सांगली जिह्यात 14 लाख दस्तावेजांची तपासणी
कोल्हापुरात 21 तास विसर्जन सोहळा, 2700 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन; मध्यरात्री साऊंड सिस्टीम बंद
अहिल्यानगरमध्ये 14 गणपतींची 12 तास मिरवणूक
इचलकरंजीत 26 तास मिरवणूक
साताऱ्यात 15 तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष