माणसांपेक्षा कबुतरे महत्त्वाची आहेत का? राज ठाकरे यांचा सवाल

माणसांपेक्षा कबुतरे महत्त्वाची आहेत का? राज ठाकरे यांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 50 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट नेमकी कोणत्या मुद्दावर झाली, हे स्पष्ट केले. मुंबई शहरातील वाढती रहदारी, वाहतूक कोंडी आणि विकासाच्या नावाखाली वाढणाऱ्या अडचणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. तसेच विकासाला विरोध नसून बेशिस्त आणि मनमानी पद्धतीने होणारा विकास आणि त्यामुळे वाढणाऱ्या अडचणी याला विरोध असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच कबुतरखान्याच्या वादावरही त्यांनी परखडपणे मत व्यक्त केले.

तुमच्या घरात चार उंदीर झाले. त्याचं काय करता तुम्ही… गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का. नाही ना. कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात. काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात. रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबूतर महत्त्वाचे आहेत का, असा सवाल त्यांनी केला. तसेच तो राजकीय विषय आहे. त्यांना राजकारण करायचं होतं. त्यामुळे त्यांनी तो विषय पेरला, पण त्यांना कळलं की रिस्पॉन्स मिळत नाही. आम्हाला समजते कशाला रिस्पॉन्स द्यायचा आणि कशाला नाही. त्यामुळे आम्ही रिस्पॉन्स दिला नाही. ते विषय भरकटवतात, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

कधी हत्ती कधी कबूतर असे विषय ते सुरू करतात. त्यामुळे मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होते. माणसांपेक्षा कबूतर महत्वाची नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. कबूतर हत्तींच्या वादात राज्य सरकारचा मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या राजकीय विषयावर आम्ही प्रतिक्रिया दिली नाही. माणसांचा जीव, आरोग्य हे कबुतरापेक्षा महत्त्वाचे आहे, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;