मुंबईत उसंत, राज्यात जोर‘धार’! नाशिकमध्ये गोदावरीला पूर

मुंबईत उसंत, राज्यात जोर‘धार’! नाशिकमध्ये गोदावरीला पूर

गेले तीन दिवस मुंबईसह महाराष्ट्राला झोडपलेल्या पावसाने आज मात्र मुंबईत उसंत घेतली. मात्र राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस बरसल्याने जनजीवन विस्कळीत झाले. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आला. रत्नागिरीमध्येही पावसाचा जोर कायम असून 32 धरणे तुंडुंब भरून वाहू लागली आहेत.

मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत तीन दिवस अक्षरशः धुमाकुळ घातलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी नाशिकसह कोकणाच्या अनेक भागांत जोरदार सरी बरसल्या. नाशिकमध्ये पुरामुळे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले. गंगा-गोदावरी मंदिर अर्ध्याहून जास्त पाण्याखाली गेले. इगतपुरीमधील तीन पाडयांशी संपर्क तुटला. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे मुंबईसह राज्यभरात चार दिवसांत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;