8 वर्षांनंतर का होईना GST वर मोदी सरकारची कुंभकर्णी झोप उघडली – मल्लिकार्जुन खरगे

8 वर्षांनंतर का होईना GST वर मोदी सरकारची कुंभकर्णी झोप उघडली – मल्लिकार्जुन खरगे

जीएसटी परिषदेने कर स्लॅब ५ टक्के आणि १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे कर प्रणाली सोपी होण्याची शक्यता आहे. याआधी जीएसटीमध्ये ०%, ५%, १२%, १८%, २८% आणि विशेष दर ०.२५%, १.५%, ३% आणि ६% असे एकूण नऊ स्लॅब होते. या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 8 वर्षांनंतर का होईना जीएसटीवर मोदी सरकारची कुंभकर्णी झोप उघडली, अशी टीका त्यांनी केली आहे.

X वर एक पोस्ट करत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत की, काँग्रेस पक्षाने २०१९ आणि २०२४ च्या जाहीरनाम्यांमध्ये सोपी आणि तर्कसंगत कर प्रणालीसह जीएसटी २.० ची मागणी केली होती. पण मोदी सरकारने ‘एक राष्ट्र, एक कर’ ची संकल्पना ‘एक राष्ट्र, नऊ कर’ मध्ये रूपांतरित केली.

ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत उत्पन्न कर संकलन २४० टक्क्यांनी वाढले आणि जीएसटी संकलन १७७ टक्क्यांनी वाढले, तरीही मोदी सरकारला Rate Rationalisation साठी आठ वर्षे लागली. त्यांनी सर्व राज्यांना पाच वर्षांसाठी भरपाई देण्याची मागणी केली असून, २०२४-२५ हे आधार वर्ष घेऊन महसूल तोटा भरून काढावा, असे सांगितले. तसेच एमएसएमई आणि लघु उद्योगांसाठी जटिल जीएसटी अनुपालन प्रक्रिया बंद करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आपल्या पोस्टमध्ये मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, काँग्रेस-यूपीए सरकारने २८ फेब्रुवारी २००५ रोजी जीएसटीची औपचारिक घोषणा केली होती. २०११ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी जीएसटी विधेयक सादर केले, पण त्यावेळी भाजपने त्याला विरोध केला होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनीही याला विरोध केला होता. आता मात्र भाजपकडून विक्रमी जीएसटी संकलन साजरे केले जाते, जणू काही ते मोठे यश आहे, अशी खरगे यांची टीका आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळ्यात नक्की लावा जांभळाचे झाड, चवीसोबत आरोग्याचाही मिळेल ‘डबल डोस’ पावसाळ्यात नक्की लावा जांभळाचे झाड, चवीसोबत आरोग्याचाही मिळेल ‘डबल डोस’
पावसाळा (Monsoon) हा कोणत्याही झाडाच्या वाढीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या दिवसात भरपूर पाणी मिळत असल्यामुळे बियांचे अंकुरण लवकर होते...
टेकऑफच्या तयारीत असतानाच पक्षी धडकला, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान रद्द
Thane News – लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना तोल गेला, विटावा खाडीत तरुण पडला; शोधकार्य सुरू
Latur News – अज्ञात महिलेच्या हत्येचा उलगडा, पतीसह पाच जणांना अटक
नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांवर आपत्ती; दिल्ली, पंजाब, हरयाणातील पूरस्थितीवरून आदित्य ठाकरे यांचा केंद्रावर निशाणा
Panvel News – जामीनावर सुटलेल्या आरोपीचा पोलिसांवर कुऱ्हाडीने घाव, दोघे जखमी
हिंदुस्थानवर टॅरिफ यूक्रेन शांततेसाठी आवश्यक, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात ट्रम्प प्रशासनाचा युक्तिवाद