भाजपचा ‘बिहार बंद’ अपयशी, एकाही व्यक्तीचा पाठिंबा मिळाला नाही; तेजस्वी यादव यांचा दावा

भाजपचा ‘बिहार बंद’ अपयशी, एकाही व्यक्तीचा पाठिंबा मिळाला नाही; तेजस्वी यादव यांचा दावा

भाजपचा बिहार बंद अपयशी ठरला असून याला एकाही व्यक्तीचा पाठिंबा मिळाला नाही, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. आज भाजपने बिहार बंद पुकारला होता. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “भाजप आणि एनडीएने पुकारलेला बिहार बंद खूपच फ्लॉप होता. भाजप आणि एनडीएला एकाही सामान्य माणसाचा पाठिंबा मिळाला नाही, उलट भाजपच्या लोकांनी रस्त्यावर गुंडगिरी केली. महिला आणि शिक्षकांशी गैरवर्तन करण्यात आले, रुग्णवाहिका थांबवण्यात आल्या, इतकेच नाही तर सामान्य नागरिकांना जबरदस्तीने त्रास देण्यात आला.”

ते म्हणाले, “हे सर्व चित्र आज बिहार बंदमध्ये दिसले, म्हणजेच पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या बंदला आणि भाजपच्या लोकांना बिहारच्या एकाही नागरिकाचा पाठिंबा मिळाला नाही.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;