Jalgaon news – शेतात झोपलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; विजेचा धक्का बसून 2 लहान मुलांसह 5 जणांचा मृत्यू, चिमुकली वाचली

Jalgaon news – शेतात झोपलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; विजेचा धक्का बसून 2 लहान मुलांसह 5 जणांचा मृत्यू, चिमुकली वाचली

जळगाव जिल्ह्यातील एरंडेल तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. वरखेडी येथे शेतात झोपलेल्या मजूर कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक चिमुकली बचावली.

मिळालेल्या माहितीनुसार, मजुरीचे काम करणारे पावरा कुटुंब एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील एका शेतात मुक्कामाला थांबले होते. या शेताला घालण्यात आलेल्या कुंपणात विजेचा प्रवाह उतरला आणि विजेचा धक्का बसून पावरा कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखले झाले आहे. मृतांमध्ये आई, मुलगा, सुन आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर एक वर्षांची चिमुकली वाचली आहे. हे कुटुंब कुठले आहे याची ओळख पटविली जात असून पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, तहसीलदार प्रदिप पाटील यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधीकारी घटनास्थळी दाखल झाले असून, याबाबत अधिक तपास सुरु केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं
अनेकांना झोपण्याआधी अंघोळ करण्याची किंवा सकाळी काही नाश्ता करून मग थोड्यावेळाने अंघोळ करण्याची सवय असते. पण काहीजण कधी कधी काही...
Video नांदेडमधील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाची वाट खडतर, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे भाविकांचे हाल
GSTच्या नावाखाली मध्यमवर्गीयांची कमाई चुरून खाल्ल्यावर आता केंद्राला बदल करण्याचे सुचले, अंबादास दानवे यांची टीका
नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल