Air India – मुसळधार पावसात मुंबई विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग, एअर इंडियाच्या पायलटवर कौतुकाचा वर्षाव

Air India – मुसळधार पावसात मुंबई विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग, एअर इंडियाच्या पायलटवर कौतुकाचा वर्षाव

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असताना, विमानसेवेवरही त्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे. असे असताना, मंगळवारी एअर इंडियाचे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामध्ये एअर इंडियाचे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. यासाठी प्रवाशांनी विमानाच्या पायलटचे कौतुक केले. प्रवाशांनी पायलटला खरा हिरो म्हटले आहे. विमानाच्या सुरक्षित लँडिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर या पायलटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये विमान धावपट्टीवर सुरळीत उतरताना दिसत आहे. एका प्रवाशाने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, मुसळधार पावसात मुंबई विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले आहे. कमी दृश्यमानता असूनही सुरक्षित लँडिंग केल्याबद्दल कॅप्टन नीरज सेठी यांना सलाम.

सोशल मीडियावर या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. पायलट-इन-कमांड कॅप्टन नीरज सेठी यांचे खूप कौतुक झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबई आणि उपनगरातील रस्ते आणि सखल भागात पाणी साचले आहे. रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. यामुळे जनजीवनावर वाईट परिणाम झाला आहे. मुंबईच्या जीवनवाहिनीवरही परीणाम झाला आहे. ३७० हून अधिक उड्डाणांवरही परिणाम झाला आहे, त्यापैकी आठ विमाने इतर विमानतळांवर वळवावी लागली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बोरामणीजवळ एसटीचा अपघात; 16 जखमी बोरामणीजवळ एसटीचा अपघात; 16 जखमी
    ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसने कंटेनरला ठोकरले असून, यात 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बिदर-पंढरपूर या बसला अपघात झाला
निर्माल्यात गेलेली 2 लाखांची चेन बाप्पाच्या कृपेने परत मिळाली, सफाई कामगार ठरले विघ्नहर्ता
नवी मुंबईत उरलेले अन्नधान्य, खाद्यपदार्थ नारायण गडावर जाणार; मराठा आंदोलकांसाठी आली विक्रमी शिदोरी
डोंबिवलीत भूमाफियांनी तलाठी कार्यालय फोडले; कागदपत्रे पळवण्याचा प्रयत्न, नवे टाळे लावून पोबारा
सरकारने पुन्हा फसवले; हनुमान कोळीवाडावासीयांना क्लस्टरमध्ये कोंबणार, पुनर्वसनासाठी जमीन देण्यास नकार
धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले; कसाऱ्याजवळ अपघात; तिघांचा मृत्यू, तीन पलटी मारल्यामुळे कारचा चेंदामेंदा
शहा पुरस्कृत मिंधे गटाचा खरा चेहरा उघड, मराठी माणसाच्या आंदोलनाला मुंबईत परवानगी देऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र!