राहुल गांधींना पंतप्रधान बनवणार, तेजस्वी यादव यांनी घेतली शपथ

राहुल गांधींना पंतप्रधान बनवणार, तेजस्वी यादव यांनी घेतली शपथ

बिहारमधील नवादा येथे मंगळवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘वोटर अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी राहुल गांधींना मोठा भाऊ म्हणत महागठबंधन (आरजेडी-काँग्रेस-डावे गट) पुढील लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकारला सत्तेतून हटवून राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान बनवेल, असे ठामपणे सांगितले. नवादा येथील रोड शोमध्ये तेजस्वी यांच्या या घोषणेला उपस्थित समर्थकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

या यात्रेदरम्यान तेजस्वी यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि बिहारमधील नीतीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, भाजप आणि निवडणूक आयोग यांच्या संगनमताने बिहारमधील मतदार यादीतून लाखो मतदारांची नावे हटवली गेली आहेत. अनेक जिवंत मतदारांना मृत घोषित केल्याचा दावाही त्यांनी केला. तेजस्वी यांनी नीतीश सरकारला ‘अकार्यक्षम’ असल्याचे म्हटले/ बिहारच्या तरुणांना संधी देण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले.

तेजस्वी यादव म्हणाले की, नवादा येथे येऊन येथील लोकांना जागरूक केल्याबद्दल आम्ही राहुल गांधी यांचे आभार मानतो. आता बिहारमधून एनडीएला उखडून टाकण्याची आणि बदलाकडे वाटचाल करण्याची वेळ आली आहे. यावेळी आपण सर्वजण मिळून राहुल गांधींना लोकसभेत पंतप्रधान बनवण्यासाठी काम करू.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं
अनेकांना झोपण्याआधी अंघोळ करण्याची किंवा सकाळी काही नाश्ता करून मग थोड्यावेळाने अंघोळ करण्याची सवय असते. पण काहीजण कधी कधी काही...
Video नांदेडमधील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाची वाट खडतर, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे भाविकांचे हाल
GSTच्या नावाखाली मध्यमवर्गीयांची कमाई चुरून खाल्ल्यावर आता केंद्राला बदल करण्याचे सुचले, अंबादास दानवे यांची टीका
नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल