धनखड का लपले? बोलत का नाहीत? राहुल गांधी यांचा सवाल

धनखड का लपले? बोलत का नाहीत? राहुल गांधी यांचा सवाल

राज्यसभेत जोरजोरात बोलणारे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक ‘खामोश’ का झाले आहेत, एक शब्दही का बोलत नाहीत. ते का लपून बसलेत, असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला.

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा विरोधी पक्षांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी धनखड यांच्याविषयी भाष्य केले. ‘धनखड यांच्या राजीनाम्यामागे एक कथा आहे. काही लोकांना ती माहीत असेल, काहींना माहीत नसेल. आता त्यांच्या गायब होण्याची नवी कहाणी सुरू झाली आहे. हिंदुस्थानात अशी काय परिस्थिती निर्माण झाली आहे की माजी उपराष्ट्रपती एक शब्दही बोलू शकत नाहीत? त्यांना लपून का राहावे लागत आहे? आपण नेमके कोणत्या काळात जगत आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

संसदीय प्रथा पुनरुज्जीवित करण्याची संधी – खरगे

विरोधी पक्षाला आदर मिळत होता, त्या परंपरा मोडल्या जात आहेत. अशा वेळी संपूर्ण आयुष्य लोकशाही मूल्यांना वाहिलेल्या एका माजी न्यायाधीशाला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. सुदर्शन रेड्डींना निवडून देऊन संविधान आणि लोकशाहीची सर्वोच्च परंपरा पुन्हा प्रस्थापित करूया, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. रेड्डी यांच्या सत्काराप्रसंगी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत सपा नेते रामगोपाल यादव, डीएमकेचे थिरुची सिवा उपस्थित होते.

मतचोरीविरुद्ध वणवा पेटलाय

‘मतचोरीच्या विरोधातील वणवा बिहारमध्ये मोठय़ा प्रमाणावर पसरला आहे. तो आता रोखता येणार नाही. या देशाचा आत्माच असा आहे की येथील लोक प्रत्येक गोष्ट लगेच समजतात. बिहारमध्ये लहान मुलांच्या तोंडातही ‘व्होट चोरी’ हा शब्द आहे. हे आता थांबणार नाही,’ असा इशारा राहुल यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं
अनेकांना झोपण्याआधी अंघोळ करण्याची किंवा सकाळी काही नाश्ता करून मग थोड्यावेळाने अंघोळ करण्याची सवय असते. पण काहीजण कधी कधी काही...
Video नांदेडमधील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाची वाट खडतर, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे भाविकांचे हाल
GSTच्या नावाखाली मध्यमवर्गीयांची कमाई चुरून खाल्ल्यावर आता केंद्राला बदल करण्याचे सुचले, अंबादास दानवे यांची टीका
नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल