धनखड का लपले? बोलत का नाहीत? राहुल गांधी यांचा सवाल

धनखड का लपले? बोलत का नाहीत? राहुल गांधी यांचा सवाल

राज्यसभेत जोरजोरात बोलणारे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक ‘खामोश’ का झाले आहेत, एक शब्दही का बोलत नाहीत. ते का लपून बसलेत, असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला.

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा विरोधी पक्षांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी धनखड यांच्याविषयी भाष्य केले. ‘धनखड यांच्या राजीनाम्यामागे एक कथा आहे. काही लोकांना ती माहीत असेल, काहींना माहीत नसेल. आता त्यांच्या गायब होण्याची नवी कहाणी सुरू झाली आहे. हिंदुस्थानात अशी काय परिस्थिती निर्माण झाली आहे की माजी उपराष्ट्रपती एक शब्दही बोलू शकत नाहीत? त्यांना लपून का राहावे लागत आहे? आपण नेमके कोणत्या काळात जगत आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

संसदीय प्रथा पुनरुज्जीवित करण्याची संधी – खरगे

विरोधी पक्षाला आदर मिळत होता, त्या परंपरा मोडल्या जात आहेत. अशा वेळी संपूर्ण आयुष्य लोकशाही मूल्यांना वाहिलेल्या एका माजी न्यायाधीशाला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. सुदर्शन रेड्डींना निवडून देऊन संविधान आणि लोकशाहीची सर्वोच्च परंपरा पुन्हा प्रस्थापित करूया, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. रेड्डी यांच्या सत्काराप्रसंगी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत सपा नेते रामगोपाल यादव, डीएमकेचे थिरुची सिवा उपस्थित होते.

मतचोरीविरुद्ध वणवा पेटलाय

‘मतचोरीच्या विरोधातील वणवा बिहारमध्ये मोठय़ा प्रमाणावर पसरला आहे. तो आता रोखता येणार नाही. या देशाचा आत्माच असा आहे की येथील लोक प्रत्येक गोष्ट लगेच समजतात. बिहारमध्ये लहान मुलांच्या तोंडातही ‘व्होट चोरी’ हा शब्द आहे. हे आता थांबणार नाही,’ असा इशारा राहुल यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;