डोकेदुखी आणि झोप न येण्याच्या समस्येपासून आराम हवा, हे आयुर्वेदिक औषध ठरेल गुणकारी

डोकेदुखी आणि झोप न येण्याच्या समस्येपासून आराम हवा, हे आयुर्वेदिक औषध ठरेल गुणकारी

आजच्या धावपळीच्या जगात झोप न येणे आणि डोकेदुखी ही सर्वसामान्य समस्या बनली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मानसिक तणाव, मोबाईल फोन आणि लॅपटॉपचा अतिरिक्त वापर,खराब लाईफस्टाईल, चिंता,जादा कॅफीनचे सेवण आणि झोपेच्या अनियमित वेळा असू शकतात. अनेकदा पोषक तत्वांची कमतरता आणि हार्मोनल इम्बॅलन्स देखील झोप आणि डोकेदुखीचे कारण असू शकते.ज्यावेळी आपण रात्रभर जागतो किंवा नीट झोपत नाही,तेव्हा याचा थेट परिणाम डोके आणि शरीरावर होतो. अशा वेळी पतंजली आयुर्वेदाने सांगितलेल्या नैसर्गिक औषधाने ही समस्या काही प्रमाणात सुटू शकते.

पतंजली संशोधन संस्था, हरिद्वार यांच्या संशोधनात पतंजलीचे दिव्य मेधा वटी झोन न येण्याच्या समस्येपासून आराम देऊ शकते. तसेच डोकेदुखीला दूर करु शकते. लागोपाठ डोकेदुखी आणि झोप न आल्याने आपल्या कामावर परिणाम होतो. व्यक्तीला प्रत्येक वेळी थकल्यासारखे वाटते, चिडचिडेपणा वाढतो, एकाग्रता कमी होते. मेंदूला आराम न मिळाल्याने विस्मरणाचा आजार दूर होतो. मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होत जाते. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. झोप पूर्ण न झाल्याने हॉर्मोन्स बॅलन्स बिघडतो. त्यामुळे वजन वाढते. त्वचेच्या समस्या वाढतात.आणि पचन यंत्रणा बिघडते. सततच्या डोकेदुखीने मायग्रेनसारखा त्रास सुरु होतो.त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

दिव्य मेधा वटी खाण्याचे फायदे

आयुर्वेदाने दिव्य मेधा वटीला एक प्रभावशाली औषध मानले असून त्याने मेंदूला शांतता लाभते. पतंजली संशोधनानुसार हे औषध डोके दुखी,एंजाईटी कमी करण्यास मदत करते. ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्वगंधा आणि जटामांसी सारख्या जडीबुटीपासून हे औषध बनले आहे. ते मेंदूच्या नसांना शांत करते. झोपेला नैसर्गिक पणे वाढवते.याच्या नियमित सेवनाने मानसिक थकवा दूर होतो. एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती चांगली होते.

या औषधाने स्ट्रेस हॉर्मोन आणि ब्लड प्रेशर नियंत्रित होते. मानसिकदृष्ट्या बळ मिळते, अभ्यास करणाऱ्या मुलांना, ऑफिसात काम करणारे तरुण आणि वयस्कांसाठी हे औषध लाभकारी आहे. याचे सेवन करण्याआधी कोणत्याही आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

या गोष्टीची काळजी घ्या..

हे औषध रोजी रिकाम्या पोटी वा जेवणानंतर कोमट पाण्यासोबत घ्यावे.

जादाकाळ मोबाईल,लॅपटॉप आणि टीव्ही पाहणे टाळावा

रात्री झोपण्याआधी किमान एक तास आधी कोणतीही स्क्रीन पाहू नका

रात्रीचा कॅफीन आणि जड आहार घेऊ नये

योग आणि एक्सरसाईजला दिनश्चर्यचा भाग बनवा

तनाव कमी करण्यासाठी मेडिटेशन करा, पुरेसे पाणी प्या, बॅलेंस्ड डायट करा

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Amarnath Yatra Bus Accident – जम्मू-श्रीनगर महामार्गावर अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला अपघात; 4 जण जखमी Amarnath Yatra Bus Accident – जम्मू-श्रीनगर महामार्गावर अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला अपघात; 4 जण जखमी
अमरनाथ यात्रा मार्गावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला मंगळवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले आहेत....
संगमेश्वर महामार्ग नव्हे मृत्यूचा मार्ग…! ठेकेदार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अपघातांची मालिका सुरुच
सरकारचा दबाव, राजकीय वाद, अविश्वास प्रस्तावाचा इशारा की प्रकृती अस्वास्थ? धनकड यांच्या राजीनाम्यावरून तर्कवितर्क सुरू
105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राला ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर, सुप्रिया सुळे संतापल्या
लँडिंग करताच एअर इंडियाच्या विमानाला आग, दिल्लीतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील घटना
कितीही संकटे येवोत, ती परतून लावण्याची ताकद शिवसैनिकांच्या निष्ठेत आहे; बबनराव थोरात यांचा विश्वास
संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब; विरोधकांचा गदारोळ, बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीला विरोध