दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, सप्टेंबर महिन्यात पर्यंत मोठे बदल होण्याची शक्यता

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, सप्टेंबर महिन्यात पर्यंत मोठे बदल होण्याची शक्यता

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनाम्याचे पत्र लिहिले आहे. मात्र त्यांच्या राजकारणावरून राजधानी दिल्लीत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. कालपर्यंत राज्यसभेत उपस्थित असणाऱ्या धनखड यांनी अचानक तडकाफडकी राजीनामा का दिला यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी, दिल्लीत सप्टेंबर महिन्यात मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, ”कालपर्यंत सभापती बरे होते. काल मी पाहिलं सिंदूर प्रकरणात खर्गे जेव्हा बोलायला उभे राहिले. तेव्हा त्यांचा माईक अचानक बंद झाला. त्यानंतर भाजपचे सभागृह नेते जे पी नड्डा बोलायला उभे राहिले व त्यांनी सभापती व उपराष्ट्रपतींचे अधिकार आपल्याकडे घेतले. त्यांनी खर्गेजींना सांगितलं की तुम्ही जे बोलताय ते रेकॉर्डवर जाणार नाही. आम्ही जे बोलतोय तेच रेकॉर्डवर जाईल. हे संविधानानुसार सभापती पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

पडद्यामागे मोठं राजकारण सुरू

‘पडद्यामागे सध्या मोठं राजकारण सुरू आहे. दिल्लीत सप्टेंबर महिन्यात मोठी उलथापालथ होऊ शकते. त्याची ही पडलेली पहिली विकेट आहेत. पहिला बुरुज ढासळला. मला जे संकेत मिळतायत की भाजपचा एक वरिष्ठ नेता जो 75 वर्षांचा होत आहे त्याच्यासाठी हे पद रिकामं करण्याचा प्रयत्न झाला आहे. पंतप्रधान आहेत, राजनाथ सिंह आहेत. हे संविधानिक महत्त्वाचं पद त्यांच्या सोयीसाठी रिकामं करावं लावलं. असा माझा अंदाज आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Amarnath Yatra Bus Accident – जम्मू-श्रीनगर महामार्गावर अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला अपघात; 4 जण जखमी Amarnath Yatra Bus Accident – जम्मू-श्रीनगर महामार्गावर अमरनाथ यात्रेकरूंच्या बसला अपघात; 4 जण जखमी
अमरनाथ यात्रा मार्गावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला मंगळवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले आहेत....
संगमेश्वर महामार्ग नव्हे मृत्यूचा मार्ग…! ठेकेदार आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अपघातांची मालिका सुरुच
सरकारचा दबाव, राजकीय वाद, अविश्वास प्रस्तावाचा इशारा की प्रकृती अस्वास्थ? धनकड यांच्या राजीनाम्यावरून तर्कवितर्क सुरू
105 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्राला ‘भिकारी’ म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर, सुप्रिया सुळे संतापल्या
लँडिंग करताच एअर इंडियाच्या विमानाला आग, दिल्लीतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील घटना
कितीही संकटे येवोत, ती परतून लावण्याची ताकद शिवसैनिकांच्या निष्ठेत आहे; बबनराव थोरात यांचा विश्वास
संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब; विरोधकांचा गदारोळ, बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीला विरोध