मी नैराश्यग्रस्त असताना हिंदुस्थानात परतले, माझे डोके भिंतीवर आपटावे असे सतत वाटायचे! शिल्पा शिरोडकर

मी नैराश्यग्रस्त असताना हिंदुस्थानात परतले, माझे डोके भिंतीवर आपटावे असे सतत वाटायचे! शिल्पा शिरोडकर

शिल्पा शिरोडकर ही 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. तिने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आणि ब्लॉकबस्टर चित्रपटही दिले. तिच्या चित्रपटांमध्ये ‘हम’, ‘आंखें’, गोपी-कृष्ण आणि ‘खुदा गवाह’ सारखे हिट चित्रपट समाविष्ट आहेत. परंतु तिने मात्र तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना बॉलिवूडला रामराम केला. लग्न करुन तिने परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच तिने एका मुलाखतीत तिच्या एकूणच कारकिर्दीसोबत वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिरोडकरने सांगितले की, अपरेश रणजीत (बँकर आणि डबल एमबीए) शी लग्न केल्यानंतर तिचे आयुष्य बदलले. लग्नानंतर ती न्यूझीलंडला गेली आणि तिला या निर्णयाचा कधीही पश्चात्ताप झाला नाही. ती म्हणाली, “मला ब्रेक घेतल्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. मी एका अतिशय गोड, छान आणि साध्या व्यक्तीशी लग्न केले आणि माझे आयुष्य सुरू करण्यासाठी मला हेच हवे होते.”

शिल्पा येत्या काही दिवसांमध्ये ‘शंकर’ या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु शिल्पा ज्यावेळी हिंदुस्थानामध्ये परत आली त्यावेळी मात्र तिची मानसिक अवस्था अतिशय भीषण होती. याविषयी बोलताना शिल्पा म्हणते, जेव्हा मी हिंदुस्थानात परतले त्यावेळी माझी मानसिक स्थिती अजिबात चांगली नव्हती. मी माझे पालक गमावले होते आणि मी खूप नैराश्यात होते. मला फक्त त्यावेळी नम्रताला सोबत द्यायची होती म्हणूनच मी हिंदुस्थानात परत आले. माझ्या मनात कामाबद्दल कोणताही विचार नव्हता” असे तिने पिंकव्हिलाशी झालेल्या संभाषणात सांगितले. यावर अधिक बोलताना ती म्हणाली, मला माझे डोके भिंतीवर आपटून स्वतःला संपवावे असे वाटत असे. या काळामध्ये तिला तिच्या नवऱ्याने आणि बहिणीने नम्रताने फार मोलाची साथ दिल्याचेही ती म्हणते.

शिल्पाने तिचे लग्न कसे ठरले यावरही भाष्य केले आहे. ती म्हणाली की, तिच्या पतीला भेटल्यानंतर मुंबई सोडण्याचा निर्णय तिच्यासाठी सोपा झाला. ती म्हणाली, “मी कधीही मुंबई सोडू इच्छित नव्हते कारण मी माझ्या पालकांच्या खूप जवळ होते, परंतु नंतर मी माझ्या पतीला भेटले आणि दीड दिवसात मी त्याला होकार दिला.” ती पुढे म्हणाली, “तो शिक्षणासाठी परदेशात जाणार होता… मला त्याचा प्रामाणिकपणा इतका आवडला की, मी काय करतेय हे देखील मला समजलेही नाही.”

शिल्पाने तिच्या शिक्षणाबद्दल एक आश्चर्यकारक खुलासाही केला. शिल्पाने सांगितले. “मी दहावीत नापास झाले आहे. माझा नवरा बँकर आहे. त्याने डबल एमबीए केले आहे आणि तो खूप शिक्षित आहे. शिल्पाने हिंदुस्थानात आल्यानंतर काही दिवसांनी बिग बाॅस या रिअॅलिटी शो मध्ये भाग घेऊन सर्वांचीच मने जिंकली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;