देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देतायत हा शेतकरी वर्गाचा अपमान, संजय राऊत यांची टीका

देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देतायत हा शेतकरी वर्गाचा अपमान, संजय राऊत यांची टीका

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनात जंगली रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे व सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच ”मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वाढदिवशी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना भेट दिली पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या वाढदिवशी माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या असंवेदनशील कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना भेट दिली पाहिजे. असंवेदनशील, अकार्यक्षम असा कृषीमंत्री सातत्याने महाराष्ट्राला लाभला, आधी दादा भुसे कृषी मंत्री होते त्यांचा शेतकऱ्यांना कधी फायदा झाला नाही. आता कोकाटेंनी तर कहर केला आहे. कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे. त्या ओसाड गावच्या पाटीलकीत मन रमत नाही म्हणून विधीमंडळात रमी खेळत बसतात. का इतके दिवस त्यांना मंत्रीमंडळात ठेवलं आहे ते कळत नाही. अशी काय मजबुरी आहे की अशा लोकांना मंत्रीमंडळात ठेवलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगतोय, आक्रोश करतोय, त्यावरून हाणामाऱ्या सुरू आहेत. तरीही देवेंद्र फडणवीस कृषी मंत्र्यांना संरक्षण देतायत हा शेतकरी वर्गाचा अपमान आहे. कोणत्याही परिस्थित कृषी मंत्र्याना राजीनामा द्यावाही लागेल व घ्यावाही लागेल”, असे संजय राऊत म्हणाले.

”या महाराष्ट्रात फक्त विरोधी पक्षाला टार्गेट केलं जातंय, माणिकराव आमचे व्यक्तीगत शत्रू नाही. शेतकऱ्यांच्या विषयांवर अजिबात गांभिर्याने काम न करणारे कृषी मंत्री या राज्याला लाभले असतील तर त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार विरोधी पक्षाला दिला आहे, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;