Maharashtra Monsoon Session 2025 – हे सरकार किती बेमुर्वतखोर आहे, या सरकारला शेतकऱ्यांविषयी कणव नाही; भास्कर जाधव यांची टीका

Maharashtra Monsoon Session 2025 – हे सरकार किती बेमुर्वतखोर आहे, या सरकारला शेतकऱ्यांविषयी कणव नाही; भास्कर जाधव यांची टीका

हे सरकार दिखाऊ नाटकीपणा करतंय. पुतनामावशीचं प्रेम शेतकऱ्यांप्रती दाखवत आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार भास्कर जाधव यांनी आज सरकारच्या धोरणांवर ताशेरे ओढले. यासंदर्भात अधिक बोलताना भास्कर जाधव म्हणाले, बैल नाही म्हणून आज महाराष्ट्राचा शेतकरी नांगर हाकतोय, त्यांच्या पत्नी नांगर हाकण्याचं काम त्याच्यासोबत करत आहे, हे दृश्य अतिशय विदारक आहे. डोक्यावर पदर घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान राखत असलेले हे जोडपे राज्याच्या सहकारमंत्र्याच्या मतदार संघातील आहे.

शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी वरळीतील एनएससीआय डोमची केली एकत्रित केली पाहणी

शेतकऱ्यांच्या होत असलेल्या याच हालअपेष्टांवर आम्ही आता स्थगन प्रस्ताव मांडला आहे. शेतकऱ्यांच्या या मुद्द्यावर विधीमंडळात चर्चा व्हायलाच हवी म्हणून आम्ही आग्रह धरला. परंतु, यावर मात्र कोणताच प्रतिसाद सरकारकडून मिळाला नाही. म्हणूनच आम्ही सभागृहातून बाहेर पडलो तर, आम्ही बाहेर पडल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम चर्चेला तयार आहे, असे म्हटले.

नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या दबावाखाली फडणवीसांना मुंबई तोडायची आहे, संजय राऊत यांची टीका

नाईलाजास्तव आम्ही बाहेर पडल्यानंतर मात्र विरोधी पक्ष चर्चेला तयार नाही, असे वातावरण तयार केले. हे सरकार किती बेमुर्वतखोर आहे, या सरकारला शेतकऱ्यांविषयी कणव नाही. आम्ही या सरकारचा निषेध करतो. सरकार दिखाऊ नाटकीपणा करतंय, पुतनामावशीचं प्रेम दाखवतंय या सरकारवर विश्वास ठेवू नका अशी आम्ही विनंती करतोय, असे आवाहन भास्कर जाधव यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुण्यात महिला उतरल्या रस्त्यावर वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पुण्यात महिला उतरल्या रस्त्यावर
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे चहासाठी थांबलेल्या वारकरी कुटुंबातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आले. ‘महिला...
ICC Test Ranking – लागोपाठच्या शतकाने पंतला फायदा
Wimbledon 2025 – अल्कराझचे वादळ घोंघावू लागले
सुभाष पुजारीचा अमेरिकेत सुवर्ण धमाका, जागतिक पोलीस स्पर्धेत हिंदुस्थानचा तिरंगा फडकावला
अविश्वसनीय अन् अवघड; बुमराच्या विश्रांतीच्या निर्णयावर रवी शास्त्री हैराण
ठाण्याच्या रुग्णालयावर परिवहन विभागाची गुरु‘कृपा’, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारकडून कारवाईचा इशारा 
ऑलिम्पिक यजमानपदासाठी हिंदुस्थानचा दावा; अहमदाबादमध्ये स्पर्धा आयोजनाची तयारी, सौदी अन् तुर्कीही यजमानपदाच्या शर्यतीत