बीडीडीप्रमाणे बीआयटी चाळींचा पुनर्विकास करा, प्रदूषित माहूलमध्ये पाठवलेल्या रहिवाशांना माझगावमध्ये निवारा द्या! मनोज जामसुतकर यांची मागणी

बीडीडीप्रमाणे बीआयटी चाळींचा पुनर्विकास करा, प्रदूषित माहूलमध्ये पाठवलेल्या रहिवाशांना माझगावमध्ये निवारा द्या! मनोज जामसुतकर यांची मागणी

माझगाव-ताडवाडी बीआयटी चाळींचा बीडीडीप्रमाणे पुनर्विकास  करा. प्रदूषित माहुलमध्ये स्थलांतरित केलेल्या 220 रहिवाशांना तातडीने मूळ माझगाव विभागात स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.

भायखळा विधानसभा मतदारसंघात माझगाव ताडवाडी बीआयटी चाळींचा परिसर आहे. सुमारे 100 वर्षे जुन्या इमारती आहेत. या इमारतींचा पुनर्विकास होण्यासाठी बारा ते सोळा क्रमांकाच्या पाच इमारतींमधील रहिवासी संक्रमण शिबिरात गेले आहेत. त्यातील 220 लोकांना माहुलमध्ये नेले आहे. नऊ वर्षांपासून हे रहिवासी माहुलमध्ये राहात आहेत. त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात प्रदूषण आहे, तर बाकीच्या तीन इमारतींमधील रहिवाशांसाठी माझगावमध्येच संक्रमण शिबीर बांधले आहे. त्यामुळे या रहिवाशांना पुन्हा माझगावमध्ये आणावे. माझगाव ताडवाडी पुनर्विकासाचे काम हे बीडीडी चाळी, अभ्युदय नगरच्या धर्तीवर विशिष्ट धोरण राबवून पुनर्विकास करण्याची मागणी जामसुतकर यांनी केली.

नागपूरच्या हिवाळी आणि मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशात मी मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात बैठक बोलावण्याची मागणी केली होती, पण अजूनही बैठक आयोजित केली नाही. गेल्या सहा महिन्यांत यासंदर्भात दोनवेळा मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. पण अजूनही वेळ दिलेला नाही. शासनाने यामध्ये लक्ष घालून माझगाव ताडवाडीतील रहिवाशांना न्याय द्यावा अशी मागणी मनोज जामसुतकर यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिस्टिम शेतकऱ्यांचा जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधींचा हल्लाबोल सिस्टिम शेतकऱ्यांचा जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यामध्ये...
‘रामायण’ चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘रामा’वतार
सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सर निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅनच्या खरेदीत घोटाळा, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
नरेंद्र जाधवच नाही तर भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबळे आले तरी समितीचा अहवाल स्वीकारणार नाही! संजय राऊत यांनी ठणकावलं
Delhi Crime – दिल्ली हादरलं! संतापलेल्या नोकराने आई आणि मुलाला जीवानीशी मारलं, कारण वाचून तुम्हीही स्तब्ध व्हाल
वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी
Pune Crime – तोंडावर स्प्रे मारत कुरियर बाॅयने तरुणीवर केला बलात्कार, धमकीही दिली