महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल; फेरतपासणीला इंडिया आघाडीने घेतला आक्षेप;निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी चर्चा

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल; फेरतपासणीला इंडिया आघाडीने घेतला आक्षेप;निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी चर्चा

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल सुरू झाला असून निवडणुकीच्या तोंडावर फेरतपासणीच्या नावाखाली लाखो नावे हटवण्याचा डाव मोदी सरकारच्या इशाऱ्यावर नाचणाया निवडणूक आयोगाने आखला आहे. इंडिया आघाडीने याला जोरदार आक्षेप घेतला असून आज 11 घटक पक्षांच्या सदस्यांनी निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी चर्चा केली आणि मतदार याद्यांची विशेष फेरतपासणी मोहीम रद्द करण्याची मागणी लावून धरली.

बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष फेरनिरीक्षण मोहीमेवर आक्षेप घेतले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी आज दिल्लीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. बैठकीला काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी, राजदचे मनोज झा, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, सपाचे रामगोपाल यादव, राष्ट्रवादीच्या फौजिया खान हे उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या बैठकांना यापुढे प्रत्येक राजकीय पक्षाचे अध्यक्षच उपस्थित असायला हवेत असे आयुक्तांचे म्हणणे होते. त्याला सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी कडाडून विरोध केला. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांना हा नवा नियम मागे घ्यावा लागला.

महाराष्ट्रातील वाढीव 8 टक्के मतांवरून शिवसेनेने आयोगाला धारेवर धरले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील वाढीव 8 टक्के मतांवरून शिवसेनेने निवडणूक आयोगाला चांगलेच धारेवर धरले. मतदानाची ही टक्केवारी वाढली कशी, एकेका बूथवर किती टोकन वाटली, याचा तपशील मागितला. परंतु, त्याचा तपशील दिला गेला नाही. वाढीव मतदार कुठून आले याचे समर्पक उत्तर निवडणूक आयोगाने दिले नाही. केवळ 130 पानांचे उत्तर देण्याची नौटंकी केली. त्यात एकही गोष्ट खरी नाही, असे अनिल देसाई यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;