ठाण्याच्या रुग्णालयावर परिवहन विभागाची गुरु‘कृपा’, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारकडून कारवाईचा इशारा 

ठाण्याच्या रुग्णालयावर परिवहन विभागाची गुरु‘कृपा’, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारकडून कारवाईचा इशारा 

धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एसटी कर्मचाऱ्यांना ठाण्याच्या गुरुकृपा रुग्णालयाचे आरोग्य तपासणी सर्टिफिकेट घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र असेल तर तीन हजार दिले जातील, मात्र यामुळे गाव-खेड्यातून कर्मचाऱ्यांना पदरमोड करून ठाणे शहरात यावे लागत आहे. ठाण्यातीलच या रुग्णालयावर सरकारची ‘कृपा’ कशासाठी, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत ही सक्ती रद्द करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

…तर दोषींवर कठोर कारवाई करू!

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच डॉक्टरच्या सर्टिफिकेटसाठी दबाव टाकू नये. असे प्रकार होत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. कोणीही एकाधिकारशाहीने असा निर्णय घेत असेल तर तरीही असा प्रकार घडला असेल तर चौकशी करून जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असे आश्वासन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिषदेत दिले.

एकाच डॉक्टरकडून प्रमाणपत्र का घेतले जातेय?

कायद्यात बदल करून परिवहन महामंडळ किरण पंडित नावाच्या डॉक्टरपुढे पायघड्या का घालत आहे? या एकाच डॉक्टरचे प्रमाणपत्र आणण्यासाठी कर्मचाऱ्यांवर सक्ती का केली जात आहे, असा सवाल अनिल परब यांनी विचारला. दरम्यान, परिवहन विभागाची 10 हजार कोटींची बिले प्रलंबित असताना ठाण्यातील किरण पंडित या डॉक्टरच्या सर्टिफिकेटची सक्ती कशासाठी सुरू आहे? नांदेड, सांगली, रत्नागिरी या भागात विशेष युनिट स्थापन करण्यात आली आहेत. मग एकावर सरकारची कृपा कशासाठी, असा सवाल दानवे यांनी विचारला. या विषयावर भाई जगताप, प्रवीण दरेकर यांनीदेखील प्रश्न विचारले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिस्टिम शेतकऱ्यांचा जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधींचा हल्लाबोल सिस्टिम शेतकऱ्यांचा जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यामध्ये...
‘रामायण’ चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘रामा’वतार
सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सर निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅनच्या खरेदीत घोटाळा, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
नरेंद्र जाधवच नाही तर भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबळे आले तरी समितीचा अहवाल स्वीकारणार नाही! संजय राऊत यांनी ठणकावलं
Delhi Crime – दिल्ली हादरलं! संतापलेल्या नोकराने आई आणि मुलाला जीवानीशी मारलं, कारण वाचून तुम्हीही स्तब्ध व्हाल
वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी
Pune Crime – तोंडावर स्प्रे मारत कुरियर बाॅयने तरुणीवर केला बलात्कार, धमकीही दिली