चार वर्षांत 379 पोलिसांचा मृत्यू; 25 पोलिसांनी केली आत्महत्या, सुनील शिंदे यांनी केली चौकशीची मागणी

चार वर्षांत 379 पोलिसांचा मृत्यू; 25 पोलिसांनी केली आत्महत्या, सुनील शिंदे यांनी केली चौकशीची मागणी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पोलीस दलावर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यात आर्थिक संकटे, संसारिक प्रश्न अशा अनेक गोष्टी आहेत. यामुळेच गेल्या चार वर्षांत 379 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यातील 25 पोलीस अधिकारी-अंमलदारांनी आत्महत्या केली आहे. या सर्व मृत्यूंची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत केली.

पोलिसांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत किंवा मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र विभागातील प्राध्यापकांमार्फत चौकशी करावी. त्याचबरोबर पोलिसांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत, याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, या पोलिसांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी कोणताही संशय व्यक्त न केल्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यात आली नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात दिली.

विनाअट नोकरीत सामावून घ्या!

कर्तव्यावर असताना ज्या पोलिसांचा मृत्यू झाला आहे किंवा ज्यांनी आत्महत्या केली आहे, अशा पोलिसांच्या वारसाला विनाअट पोलीस खात्यांत सामावून घ्यावे, पोलिसांना नव्या गृहनिर्माण धोरणानुसार माफक दरात घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शिंदे यांनी केली. दरम्यान, अनुपंपा तत्त्वावर अशा पोलिसांच्या मुलांना सामावून घेतले जाते, असे कदम यांनी सांगितले.

आरोग्य शिबिरांचे आयोजन 

मुंबई पोलीस दलातील पोलिसांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वैद्यकीय शिबिरे, आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येतात. त्याचबरोबर मान्यवर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समुपदेशन करण्यात येते. 40 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. टाटा आणि ए. के. मेहता या रुग्णालयांबरोबर पॅन्सर पॅम्प आयोजित करण्यात आले. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर रुग्णालयात मोफत उपचार दिले जात आहेत, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिस्टिम शेतकऱ्यांचा जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधींचा हल्लाबोल सिस्टिम शेतकऱ्यांचा जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यामध्ये...
‘रामायण’ चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘रामा’वतार
सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सर निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅनच्या खरेदीत घोटाळा, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
नरेंद्र जाधवच नाही तर भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबळे आले तरी समितीचा अहवाल स्वीकारणार नाही! संजय राऊत यांनी ठणकावलं
Delhi Crime – दिल्ली हादरलं! संतापलेल्या नोकराने आई आणि मुलाला जीवानीशी मारलं, कारण वाचून तुम्हीही स्तब्ध व्हाल
वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी
Pune Crime – तोंडावर स्प्रे मारत कुरियर बाॅयने तरुणीवर केला बलात्कार, धमकीही दिली