व्हीआयपींच्या दर्शनामुळे भाविक, प्रशासन हैराण; वारीच्या नियोजनापेक्षा सरबराईत जातोय वेळ

व्हीआयपींच्या दर्शनामुळे भाविक, प्रशासन हैराण; वारीच्या नियोजनापेक्षा सरबराईत जातोय वेळ

आषाढी वारीचा सोहळा जसजसा जवळ येतोय, तसतसे आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या विठ्ठलभक्तीला उधाण येऊ लागले आहे. वारी नियोजनाचा आढावा, याचे निमित्त साधून रोज कोणी ना कोणी व्हीआयपी पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. याचा दर्शनरांगेतील भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय वारीच्या नियोजनात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची ससेहोलपट होताना दिसते. मंत्र्यांच्या या अनाकलनीय दौऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळीच आवर घालण्याची गरज आहे.

आषाढी वारीचा सोहळा आठवडाभरावर आला आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना आवश्यक त्या मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी शासकीय यंत्रणेची दमछाक होत असताना, रोज व्हीआयपींचे दौरे होत आहेत.

वारी नियोजनाचा आढावा घेण्याचे निमित्त करून आलेली ही राजकीय मंडळी आढावा घेऊन आल्या पावलांनी परतीचा रस्ता धरत नाहीत, तर ते थेट शॉर्टकट मार्गाने श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाला जातात. या राजकीय व्हीआयपी नेत्यांसोबत त्यांचे पाच-पन्नास कार्यकर्तेदेखील दर्शनासाठी मंदिरामध्ये घुसखोरी करतात. मंदिरातील या राजकीय घुसखोरीमुळे पोलीस, मंदिर प्रशासन आणि नेते यांच्यात रोज शाब्दिक चकमकी झडत आहेत. व्हीआयपींचे दर्शन आणि त्यांचा सत्कार यातच शासकीय यंत्रणेचा वेळ वाया चालला आहे. या राजकीय नेत्यांचा त्रास केवळ प्रशासनाला नाही, तर रांगेत अनेक तास तिष्ठत उभ्या असणाऱया वयोवृद्ध भाविकांना बसतो आहे.

वारीच्या तोंडावर कामांचा आढावा घेण्याची नौटंकी करणाऱया राजकीय नेत्यांच्या दौऱयाला मुख्यमंत्र्यांनी वेळीच रोखले नाही, तर भाविकांच्या सेवा-सुविधांमध्ये कसूर होऊ शकते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा ‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा
उसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला असतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. उन्हाळ्यात तर आवर्जून लोकं कोल्ड्रींक्सपेक्षा उसाच्या रसाला...
आधी मसाला स्प्रे मारला मग चाकूने केले वार, त्यानंतर…; पतीकडून अभिनेत्रीला जीवेमारण्याचा प्रयत्न
बिहारमधील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; आढळून आले नेपाळ, म्यानमाग, बांगलादेशचे नागरिक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा, मोठा पडदा गाजवणारे दिग्गज खलनायक कोटा श्रीनिवास राव यांचं निधन
मिंधे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी लावा, संजय राऊत यांची फडणवीसांकडे मागणी
मराठी बोलणार नाही, मला मारून टाकलं तरी चालेल! प्रसिद्ध अभिनेत्याची मुजोरी
लॉर्ड्सवर शेवटच्या षटकात हायव्हॉल्टेज ड्रामा; शुभमन गिलचा रुद्रावतार, सिराजमधला DSP जागा झाला; नेमकं काय घडलं?