रेड्याने अडवली ‘मरे’ची वाट, तासाभरानंतर रेल्वे सेवा पूर्ववत

रेड्याने अडवली ‘मरे’ची वाट, तासाभरानंतर रेल्वे सेवा पूर्ववत

शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याणकडे जाणारी रेल्वे आज सकाळी मुंब्रा येथे रेड्याने अडवली. रेल्वे ट्रॅकवर जलद लोकलने रेड्याला धडक दिल्याने जवळपास एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरम्यान, रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे पोलीस, हमाल व अन्य नागरिकांच्या मदतीने अडकलेल्या रेड्याला बाजूला करण्यात आले. त्यानंतर लोकल सुरू झाली. या धडकेत रेड्याचा मृत्यू झाला असून तासाभरानंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली.

ठाण्याहूनच कल्याणकडे जाणाऱ्या रेल्वे लाईनच्या जलद मार्गावर मुंब्रा रेतीबंदर येथील राणा बंगल्यासमोर काल  सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. या अपघातात फास्ट लोकलने रेड्याला धडक दिल्याने रेडा लोकलच्या चाकात अडकला. रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. काही काळ कल्याणकडे जाणारा जलद रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात आला होता.

कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा
विचित्र घटनेमुळे अप आणि डाऊन जलद तसेच धीम्या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. एका तासाच्या प्रयत्नानंतर मृत रेड्याला बाहेर काढल्यात आले आणि नंतर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला होता

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather Update : महाराष्ट्राच्या दिशेनं येतय मोठं संकट; उरले फक्त काही तास, 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट IMD Weather Update : महाराष्ट्राच्या दिशेनं येतय मोठं संकट; उरले फक्त काही तास, 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्राला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय
११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ब्रेक, पहिल्याच दिवशी वेबसाईट हँग, लाखो विद्यार्थी – पालकांना मन:स्ताप
ईद नाही तर, या दिवशी प्रदर्शित होणार शाहरुख खानचा ‘किंग’ चित्रपट
महिलांविरुद्ध अशी भाषा? अभिजित अय्यर-मित्र यांना कोर्टाचा खरमरीत सवाल, Newslaundry च्या विरोधातील पोस्ट हटविणार
फडणवीसांच्या सुलतानी सरकारमध्ये शेतकरी संकटात; शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू – हर्षवर्धन सपकाळ
अणुशास्त्रज्ञ डॉ. एम.आर. श्रीनिवासन यांचे निधन, वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास