पावसानं झोडपल्यानं भाजीपाल्याला महागाईची फोडणी? शेतकरी हैराण, ग्राहकांची दाणादाण

पावसानं झोडपल्यानं भाजीपाल्याला महागाईची फोडणी? शेतकरी हैराण, ग्राहकांची दाणादाण

राज्यात दोन आठवड्यााधीच मान्सून दाखल झाला आणि राज्यात दाणादाण उडाली. अनेक भागांत पाणी साचलं होतं तर अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसामुळे हजारो हेक्टरवरची पिकं उद्ध्वस्त झाली असून या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता सर्वसामान्यांनाही याचा फटका बसणार आहे. कारण पावसामुळे भाजीपाला नष्ट झाला असून पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढतील अशी भिती व्यक्त होत आहे.

काल झालेल्या पावसामुळे राज्यातील आणखी तीन हजार हेक्टरवरील पीकं नष्ट झाली आहेत. आधीच्या पावसामुळे 31 हजार 889 हेक्टरवरील पीकं नष्ट झाली होती.

पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती, जळगाव, बुलढाणा आणि अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांना बसला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात 3 हजार 230 तर सोलापूर जिल्ह्यात 1252 हेक्टरवरील पीकं नष्ट झाली आहेत. पुण्यात 676 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे आंबा, केळी, डाळिंब आणि भाजीपाल्यांना फटका बसला आहे. सोलापुरात केळी, आंबा आणि डाळींब फळांना फटका बसला आहे. तर कांदा लिंबू, ज्वारी आणि मुगाचे पीक नष्ट झाले आहे.

या पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्याला बसला आहे. अमरावतीतील 12 हजार 295 हेक्टरवरची पीकं नष्ट झाली आहेत. त्यानंतर जळगाव 4 हजार 538 हेक्टर, बुलढाणा 4 हजार 3 हेक्टर, जालना 1726 हेक्टर आणि अहिल्यानगरमध्ये 1156 हेक्टरवरील पीकं नष्ट झाली आहेत.

पावसामुळे पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमती गगनाला भि़डल्या आहेत. काल एक किलो टोमॅटोची किंमत 5 रुपये होती. आज एक किलो टोमॅटोला 20 ते 25 रुपये मोजावे लागत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार
एसटी महामंडळाच्या नव्या  बसेस मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे हे कॅमेरे 360 अंशातून निगराणी...
सोसाट्याचा वारा अन् तुफान सरी, मुंबईत पुन्हा पाऊस; लोकलच्या वेळापत्रकाचं काय?
“यै मौसम का जादू है मितवा…”, पावसात धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा छत्री घेऊन रेन डान्स
ऐश्वर्या नारकरांच्या मुलाचा एअरपोर्टवर खुल्लम खुल्ला रोमान्स; पहा व्हिडीओ
वडिलांचे अफेअर्स असूनही आई घटस्फोट का देत नाही? सूरज पांचोलीने सांगितलं खरं कारण
जेनिफर विंगेटने करण सिंह ग्रोवरला का दिला घटस्फोट? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकीत!
Skin Care- चेहऱ्यावर साखर लावा, सुरकुत्या घालवा! वाचा सविस्तर