पाणीसाठा अवघ्या 28 टक्क्यांवर; राज्यातल्या धरणांनी तळ गाठला, कोयना धरणात फक्त 19 टक्के, मुंबईचा पाणीसाठा 16 टक्क्यांवर

पाणीसाठा अवघ्या 28 टक्क्यांवर; राज्यातल्या धरणांनी तळ गाठला, कोयना धरणात फक्त 19 टक्के, मुंबईचा पाणीसाठा 16 टक्क्यांवर

मान्सूनच्या आगमनाचे सर्वांना वेध लागले असले तरी सध्याच्या घडीला राज्यातल्या सर्व धरणांतील पाणीसाठा अवघ्या 28.10 टक्क्यांवर आला आहे. वीज निर्मितीचे प्रमुख केंद्र असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा तर फक्त 19.36 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पाऊस लांबला तर वीज निर्मितीचे संकट निर्माण होऊ शकते.

राज्याच्या विविध भागात लहान-मध्यम आणि मोठी मिळून सुमारे 2 हजार 997 धरणे आहेत. या सर्व धरणांत शनिवारी 28.10 टक्के पाणीसाठा होता. मागच्या वर्षी याच दिवशी सर्व धरणांमध्ये मिळून 24.79 टक्के पाणीसाठा होता.

राज्याला मान्सूनचे वेध लागले आहेत, पण तरीही राज्य सरकारच्या वतीने पाणीसाठय़ाचा आढावा घेतला तेव्हा सध्या चिंतेचे वातावरण असल्याची परिस्थिती आहे. मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे, पण तरीही मोसमी वाऱ्यांमध्ये काही बदल झाला तर मान्सून लांबण्याचीही शक्यता असते. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने मुंबईसह राज्यातील पाणीसाठय़ाचा आढावा घेण्यात आला.

वीज निर्मितीची चिंता

कोयना धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती होते. त्यामुळे या धरणातील पाणीसाठय़ावर जलखात्याचे लक्ष असते. मागील पावसाळय़ात कोयना धरण 100 टक्के क्षमतेने भरले होते. पण उन्हाळय़ाची तीव्रत वाढल्याने धरणातील पाणीसाठा खालावत गेला आणि सध्याच्या धडीला या धरणातील पाणीसाठा फक्त 19.36 टक्क्यांवर आला आहे.

पुण्यातील पाणीसाठा सर्वात कमी

नागपूरमधील धरणात 33.53 टक्के पाणीसाठा आहे. अमरावती 39.85 टक्के, संभाजीनगर 27.67 टक्के, नाशिक 29.97 टक्के, कोकण 28.10 टक्के आणि सर्वात कमी म्हणजे फक्त 20.88 टक्के पाणीसाठा पुण्यातील धरणांमध्ये आहे.

मुंबईतील परिस्थिती चिंताजनक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 16 टक्क्यांवर आला आहे. मध्य वैतरणा 15.33 टक्के, भातसा 34.64 टक्के, मोडक सागर 51.17 टक्के, तानसा 28.03 टक्के, वैतरणा 39.43 टक्के.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;