पालीत घरकुलाचा हप्ता थकला; आदिवासींचा संसार उघड्यावर, सरकारी काम आणि सहा महिने थांब

पालीत घरकुलाचा हप्ता थकला; आदिवासींचा संसार उघड्यावर, सरकारी काम आणि सहा महिने थांब

सरकारी काम आणि सहा महिने थांब असे विनोदाने म्हटले जाते, पण प्रत्यक्षात सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खुरावळे गावातील आदिवासींना अशीच काहीशी परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. घरकुलाचा हप्ता थकला असल्याने या आदिवासींचा संसार उघड्यावर आला असून खुरावळेवासीय अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रत्येक गोरगरीबाला स्वतःचे छप्पर मिळावे यासाठी केंद्र सरकारकडून घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार चिवे ग्रामपंचायत हद्दीतील खुरावळे आदिवासी वाडीतील सहा कुटुंबांनी आपले राहते घर पाडून त्याठिकाणी मंजूर घरकुलांतर्गत बांधकामाला सुरुवात केली. घरकुल मंजूर झाल्याने ग्रामसेवकांनी त्यांना घर पाडून घरकुल बांधण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्यांनी आपली झोपडी पाडून घरकुलाची पायाभरणीही केली. त्यांना घरकुलाचा पहिला हप्ताही मिळाला. परंतु अचानक ग्रामसेवकाने स्थानिक तक्रार करत असल्याचे सांगून घरकुलाचे कामाची बिले थांबवली.

सध्या आमच्या कुटुंबाला निवारा नसल्याने जंगल पट्ट्यात उघड्यावर जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. पूर्ण रक्कम देऊन आम्हाला घरकुल पूर्ण करू द्या. ऐन पावसाळ्यात आमच्या कुटुंबातील सदस्यांचे काही बरे वाईट झाल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार असेल. गीता वाघमारे (घरकुल लाभार्थी)

गीता वाघमारे, लता वाघेरे, गुलाब वाघमारे, आशा हिलम, नथू पवार, दीपाली पवार ही सहा कुटुंबे हवालदिल झाली आहेत. मुलाबाळांसह उघड्यावर राहावे लागत असल्याने वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली आपला संसाराचा गाडा हाकत आहेत. हक्काचे छप्पर आम्हाला मिळवून द्यावे व आमच्या मुलाबाळांचे रक्षण करावे, अशी भावनिक साद घालत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मोदीजी पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? तुमचं लक्ष..’, प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा हल्लाबोल ‘मोदीजी पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? तुमचं लक्ष..’, प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा हल्लाबोल
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांवर गोळीबार केला....
बॉलिवूड सेलिब्रिटींचे वॉर्डरोब्स पाहिले का; आलिया-करीनाचं लाखोंच्या किंमतीचे शूज अन् बॅग कलेक्श
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मुलीची हत्या, सेलिब्रिटीने भोगली जन्मठेपेची शिक्षा, हैराण करणारं प्रकरण
रात्री दही खाणे आरोग्यासाठी हानिकारक, जाणून घ्या कारण
onions benefits: फक्त भाजीची चवचं नाही तर आरोग्यासाठी संजीवनी ठरतो कांदा… जाणून घ्या फायदे
आंबा खाल्ल्याने शुगर वाढते का ? मधुमेह असलेल्या लोकांनी वाचायलाच हवे ‘हे’ स्पष्टीकरण
बडीशेपचे पाणी पिल्याने वजन कमी होण्यास खरोखर मदत होते का? वाचा सविस्तर